बौध्द महिलेवर हल्ला, विनयभंग; बीड हादरले

बीड : नेकनुर पोलीस स्टेशन हद्दीत बेलखंडी पाटोदा गावातील घटना आहे.
गावांमध्ये कुचेकर व वाघमारे या दोन महिला घरासमोर त्यांच्या स्वतःच्या दुकाना समोर बसलेल्या होत्या गावातील चार-पाच गावगुंड पूर्ण नशे मध्ये त्या ठिकाणी येऊन बसले, घाण घाण शिव्या देऊ लागले, त्यामुळे त्या महिलांनी त्यांना सांगितलं की पोराहो तुम्ही या ठिकाणी शिव्या देऊ नका लहान मुली महिला आहेत. त्यावेळेस त्यातल्या एका व्यक्तीने जातिवाचक शिवी देऊ त्या महिलेच्या पायावर लाकूड मारलं आणि हे भांडण पेटत गेलं त्या चार-पाच जणांनी त्या महिलेला दुकानांमध्ये शिरून बाहेरून वढून मारहाण केली. त्यांच्या दोन मुलांना अवघड जागेवर मुका मार देऊन बेदम मारहाण केली.
पीडित पोलीस स्टेशन लिंबागणेश वरुन नेकनुर या ठिकाणी पोहोचले 7 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी बसून घेतलं त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. पोलीस स्टेशनचे कर्मचारी असं म्हणत होते की आपण त्या व्यक्तींना बोलून घेऊन या ठिकाणी मिटवून घेऊ. ज्या व्यक्तींनी मारहाण केली ते सर्व फरार झाले व त्यांचे वडील, पोलीस पाटील , सरपंच, पोलीस स्टेशन या ठिकाणी आले. म्हणून कर्मचारी एफआयआर दाखल करायला तयार होत नव्हते.
त्यावेळेस त्यातील एका पिडीताने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी दिपक केदार यांनी संवाद साधला. ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा अध्यक्ष नितीन सोनावणे यांना पाठवून तिथे जाण्यास सांगितले.
जिल्हा अध्यक्ष नितीन सोनावणे, शहर अध्यक्ष प्रेम कांबळे, कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनला पोहोचले तिथे पोलिसांची भूमिका प्रकरण दडपण्याची दिसताच स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करून नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणी रात्री 2 वाजून 27 मिनिटांनी 324, 323, 504, 143, 147, 149,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ॲट्रॉसिटी ॲक्टचे 3 (1) (r), 3 (1) (s), 3 (2) (va), कलाम अंतर्गत गुन्हा नोंद केला.
ऑल इंडिया पँथर सेना धावून गेली म्हणून या प्रकरणाला न्याय मिळाला अन्यथा हे प्रकरण रात्रीच दडपून टाकले असते. या घटनेतील आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा सुद्धा जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला आहे!