दिपकभाई केदार यांचा 05 ऑगस्ट वाढदिवस “स्वाभिमान – संघर्ष दीन” म्हणून साजरा करा – महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांचे आवहन

परभणी : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या नेतृत्वात आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाची सुरवात झाली. राज्यभर गेली 15 वर्ष ते संघर्ष करत आहेत. दलित अत्याचारा विरोधात ते लढत आहेत. न विकता, न झुकता स्वाभिमानी चळवळ त्यांनी जिवंत केली आहे. आज आंबेडकरी चळवळीत दिपकभाई केदार यांच्यामुळे जिवंत पणा आलेला आहे. चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजात चांगला झालेला आहे, याचे सर्व श्रेय दिपक केदार यांना आहे.
लढत असताना अनेक गुन्हे, जेल त्यांना झाली तरीही ते डगमगले नाहीत. लढत राहिले, भिडत राहिले, संघर्ष करत राहिले. त्यांच्या संघर्षातून समाज सुरक्षीत होतोय, त्यांच्या न्याय हक्कांचा आवाज ऑल इंडिया पँथर सेना होत आहे.
दिपक केदार यांनी शेकडो घटनांना भेटी दिल्या, सर्व घटकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष केला. जेल भोगली, गुन्हे दाखल झाले तरी त्यांची संघर्ष यात्रा थांबलेली नाही. ते म्हणतात सुद्धा या रत्यावर लढता लढता मरण आले तरी चालेल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरी विरोधात त्यांचा हा लढा आहे. हा लढा लढत असताना दिपक केदार यांनी जो स्वाभिमान आणि संघर्ष अंगिकारला आहे त्याला सलाम आहे. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी “स्वाभिमान – संघर्ष दीन” साजरा करावा.
या निमित्ताने दिपकभाई केदार यांनी केलेल्या कार्यावर लिखाण करावे, गोरगरिबांना मदत करावी, समाज उपयोगी, आरोग्य विषयक, शैक्षणिक विषयक सामाजिक कार्य त्या दिवशी हाती घ्यावे व आपल्या या उभरत्या नेतृत्वाला जयभीम करून शुभेच्छा द्याव्यात.
असे जाहीर आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी केले आहे. दिपकभाई केदार यांच्या वाढदिवसाची तरुण, वृध्द, महिला, लहान लेकरं सर्वच घटक आतुरतेने वाट पाहत आहेत. आज सर्वात मोठं नव नेतृत्व, आश्वाशित, प्रामाणिक, स्वाभिमानी, निडर नेता म्हणून समाज त्यांच्याकडे बघत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.