Uncategorized

प्रस्तापितांच्या शोषित गुलामांनो..

ते कायम सत्तेत आहेत, तुम्ही कुठे आहेत ते बघा…
त्यांचं सत्तेसाठीचे बंड ठरलेले होते. राजकारणात अंतिम सत्ता एवढंच असतं, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. जसे मारवड्यांचे लेकरं लहानपणी गल्ल्यावर बसलेले असतात तसेच प्रतापितांचे हे लेकरं सत्तेचे फळे चाकत असतात. अंड्यात आहे तोवरच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत सत्ता उपभोगत असतात. घराणेशाहीच्या बळावर आमदार होऊन मंत्री होऊन मिरवत असतात. अदिती तटकरे यांची काय योग्यता आहे? घराणेशाहीच फळ त्या चाकत आहेत.
राजकारण भावनिक, तत्व, विचार यावर आधारत नसतं हे आपल्याला समजत नाही म्हणून आपण रडत असतो, असे बंड झाले की अस्वस्थ होत असतो. तुमच्यावर संमोहनाचा प्रयोग केला जातो. भावनांचा अतिरेक केला जातो, नेत्याला आपण दैवत मानायला लागतो, नीतिमत्ता नसलेला नेता कशा होऊ शकतो? एवढं साधं आपल्याला कळत नाही. कार्यकर्तृत्व काय असतं हे सुध्दा आपण समजून घेत नाही. सांगा ना, प्रफुल्ल पटेल यांनी कधी आंदोलन केलंय की जेल भोगली? काही नाही, सत्तेला राजकारणाला व्यवसाय समजून आलेले हे आयते बिळावरील नागोबा म्हणून मिरवत असतात.
महाराष्ट्रातील कुटुंबशाही, घराणेशाही हीच कायम सत्तेत राहण्यासाठी धडपडत असते. शेतात गेलं की एक कुटुंब परिवार करमणूक म्हणून सुरपरुंबा नावाचा खेळ खेळत असतो. तसाच हा खेळ आहे, कुणी विरोधक व्हायचं, कुणी सत्ताधारी व्हायचं आणि आपलं सत्तेच झाडं साबुत ठेवायचं.
सत्ता त्यांचं अंतिम ध्येय आहे. समाजव्यवस्था परिवर्तन हा त्यांचा अजेंडा नाही, समाज परिवर्तन झालं तर सत्तेपासून मुकावं लागेल, म्हणून वाटा कुणाला गेलाच नाही पाहिजे, याची काळजी केली जाते. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अजित पवार हे घराणेशाही मानणारे अन् विचारधारा नसलेले नेते आहेत. ते सत्तेशिवाय, संपत्ती शिवाय जगूच शकत नाहीत. सत्तेचे आडेक्ट झालेले कधीही विचाराला थारा देत नसतात. सत्तेचे आडिक्ट झालेल्याकडून महाराष्ट्र नैतिकतेची अपेक्षा बाळगतो आणि येतेच फसून जातो.
आता तरी मतदाराने, शोषित घटकांनी पैसे घेऊन मत देणं बंद केलं पाहिजे. एका गावातून एक आमदारकीचा उमेदवार तयार केला पाहिजे. गावातल्या मंदिरात त्या उमेदवाराच्या अर्जासाठी पैसा गोळा केला पाहिजे. लोकशाहीची ताकद काय आहे ते एकदाच या अनैतिक सत्ता पिपासू प्राण्यांना दाखवलं पाहिजे.
आश्चर्य वाटतं, 50 जागांच्या पोलीस भरतीसाठी एक लाख तरुण रांगेत उभा असतात. एकदा आमदार झालं की आयुष्यभर मोठी पेन्शन तसेच मोठे लाभ देणारी आमदारकी मिळवण्यासाठी रांगा का लागत नसतील. शोषितांच्या लेकरानी आमदार व्हावं तरच ही घराणेशाही नष्ट करता येईल. एका गावातून एक उमेदवार दिल्यास प्रस्तापितांचा खेळ खल्लास होईल. त्यासाठी आता आपण कंबर कसली पाहिजे. लोकशाही कुणाच्या बापाची नाही ती हक्काची आहे हे पेरल पाहिजे.
तयारीला लागा गाव तिथे आमदारकीचा उमेदवार हे जर रुजवलं तर यांच्या नांग्या कशा नीट होत नाहीत ते बघुया.
तुम्ही शोषित आहात एवढं लक्ष्यात घ्या. शोषितानी प्रस्तापितांची गुलामी नाकारली पाहिजे. ते टुणूक उडी मारून आज तिजोरीवर बसले तुम्ही आम्ही हळहळ व्यक्त करत बसलो.
सत्ता, तिजोरी हेच तर राजकारण आहे.
शोषीतानो, आपलं अस्तित्व निर्माण करा…

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

AllindiaPantherSena

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!