स्वराज रक्षकच अजित पवार मतावर ठाम!

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार संभाजी राजे धर्मवीर नव्हते असे विधान केले होते महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. त्या वादानंतर पहिली पत्रकार परिषद त्यांनी घेतली. ज्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. धर्मवीर की स्वराज्यरक्षक हा वाद आज अतिशय महत्वाचा झालेला आहे.
शरद पवार यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली नेहमी प्रमाणे कोड्यात उत्तर देऊन ते मोकळे झालेत. त्यांनी ठोस भुमिका दाखवली नाही. धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक या दोन्ही शब्दांना त्यांनी मान्यता दिली. यावर अजित पवारांनी मात्र मी माझ्या मतावर ठाम असल्याचे जाहीर केले. एवढंच नाही तर विरोध करणारे धर्मवीर नावाने फिल्म काढतात आणि छत्रपती संभाजी महाराजांची बरोबरी करतात हे योग्य नाही. त्यावर कुणी का बोलत नाही? हा राजेंचा अवमान नाही का असे ही त्यांनी आनंद दिघेवर निघालेल्या चित्रपट संदर्भात टिपनी केली.
आज महावितरणचे आंदोलन होते म्हणून मिडीयात हा वाद कमी होता. मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना भांडण शब्धांचे सुरू आहे. नेटकरी वैतागले आहेत तर राजकीयआंबट नेटकर्याना यानिमित्ताने भरपूर काम मिळाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही पण त्यांच्या हाताच्या बोटाला काम मिळाले आहे. असे भांडण किती काळ चालतात आणि किती काळ इतिहास माणसांना आजच्या विकासापासून वंचित ठेवणार हा गंभीर प्रश्न असल्याचे मत पँथरनामा विचारत आहे!