चळवळ

संतोष मुंडेचा मृत्यू, सरकार तरीही झोपलेली – दिपक केदार

संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे या शेतकरी तरुणांचा तडफडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथील संतोष मुंडे टिक टॉक फेम होता त्यामुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे. महावितरण च्या गलथान कारभारामुळे हे दोन बळी गेलेले आहेत. उघडी डिपी असल्यामुळे दोघांचा दुर्दैवी अंत झाला. महावितरण ग्रामीण भागात गेंड्याच्या कातडी ची झालेली असते, गावातील गावकरीच अर्धे काम करत असतात, फीउज टाकणे, डिव टाकणे असे अनेक काम गावच करतो असतो.
ऑल इंडिया पँथर सेना ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करत आहे की आपल्याकडे ऊर्जा खातं आहे, अनेक खाते झाल्यामुळे आपल्यावर तणाव असेल यात दुमत नाही. नावाला खातं ठेऊन कारभार चालवणार असाल तर असे संतोष मुंडे रोज मरत राहतील.
वाईट वाटतं एवढी मोठी घटना घडली, समाज माध्यमात आली, जनतेनी हळहळ व्यक्त केली पण ऊर्जा मंत्री या नात्याने आपण याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. आपण महाकाल मंदिरात गेलात दर्शन घेईला आणि येते ऊर्जा मिळते असं तुम्ही सांगितले, महाराष्ट्रातल्या उर्जार्चे तीन तेरा झालेत महोदय तरुण चीटकुन मरू लागलेत.
आपण एवढे असंवेदनशील कसे असू शकतात. अतिशय छोटे छोटे इव्हेंट आपण आपल्या ट्विटर अकाऊंट वर टाकतात. संतोष मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहावी असं वाटलं नाही साधं सांत्वनाचे एक ट्विट टाकता आले नाही.
आपल्या मागे समृध्दी महामार्गाचे सोहळा सहित अनेक मोठे मोठे इव्हेंट होते कदाचित आपण व्यस्त असावेत पण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तरी त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला पाठवायचे असते.
हल्ली ऐकत असतो हिदुंचे सरकार म्हणून पण हे दोघे सुद्धा हिंदु होते याचं तरी भान ठेवावं. हिंदु असे तडफडून मरत आहेत आणि त्यांच्या दुःखात सुद्धा आपण सहभागी नाहीत. संतोष मुंडे कोणता हिंदु आहे ते तरी सांगा?
ऑल इंडिया पँथर सेना आपल्या असंवेदनशील व्यवस्थेचा निषेध करत आहे. तात्काळ मानवतेचे दृष्टिकोन ठेवून तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचे कारण लक्ष्यात घेऊन प्रकरणाची गंभीर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे. संतोष मुंडे, बाबुराव मुंडे यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
संतोष मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!