आम्ही चूक केली…

मेहकर मतदारसंघातून निवडणूक लढवताना मी लोकांच्या मनातलं ऐकलं, त्यांच्या भावना जाणल्या. जेव्हा मी गावोगाव फिरलो, तेव्हा लोकांनी स्पष्टच सांगितलं, “भाई, आम्ही तुला मत देणार नाही. यावेळी आम्ही आमच्या या व्यक्तीला मत देणार.” मी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं, त्यांचा निर्णय मान्य केला, आणि मनात कुठेही कटुता ठेवली नाही. त्यांच्या निवडीचं स्वागतच केलं.पण आज, दोन वर्षांनंतर, तेच लोक मला फोन करतात.
दोन दिवसांपूर्वी लोणार तालुक्यातून एका आया-बहिणीचा फोन आला. रडतरडत त्या बोलत होत्या. म्हणाल्या, “भाई, 27 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. का? तर आम्ही निळ्या झेंड्याचं रक्षण केलं म्हणून. ती स्मशानभूमीची जागा आमच्या सातबाऱ्यावर आहे, पण आता तिथे निळा झेंडा काढायची वेळ आलीय.” त्या रडत होत्या, म्हणाल्या, “दीडशे पोरं काहीतरी करायच्या तयारीत आहेत.”
मी शांतपणे ऐकलं आणि फक्त एवढंच म्हणालो, “घाबरू नका, मी जिवंत आहे.” त्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी फोनवरूनही जाणवलं. त्या म्हणाल्या, “भाई, आम्ही किती मोठी चूक केली! ज्याला आमची कदर नाही, त्याला निवडून दिलं.”लोकांचं मन आता बदलतंय. गावागावात, शहरात, सगळीकडे एकच चर्चा आहे, “भाईला निवडलं असतं, तर आज ही वेळ आली नसती.” मला सगळे लाडाने भाई म्हणतात. त्यांनी मला मत दिलं नाही, तरी मी त्यांना कधी दोष दिला नाही. कधी म्हणालो नाही, “मग आता मला का फोन करता?” याआधीही, जेव्हा ट्रॅक्टरने दोन मुलींना उडवलं, त्यांच्या घरावर ट्रॅक्टर घातलं, तेव्हाही मी सगळ्यात आधी तिथे पोहोचलो.
तेव्हाही मी काही बोललो नाही, आणि यापुढेही बोलणार नाही.पण एकच सांगतो, येणाऱ्या निवडणुकीत तात्पुरत्या धोरणांच्या मागे लागू नका. गावात, शहरात, एक दीपक केदार आहे, जो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावत येतो. त्याच्याकडे पैसे नसतील, तर तुम्ही जमा करून द्या. पण त्याला निवडून आणा. नाहीतर पाच वर्षं पश्चात्ताप करत बसाल, की “आम्ही चूक केली.” मेहकरचा आमदार कोण आहे, काय करतोय, याची टीका मी कधी करणार नाही. लोकांनाच आता सगळं समजायला लागलंय. त्यांना त्यांच्या निवडीचं फळ दिसतंय.
पॅन्थरनामा