चळवळ

आधी आरएसएस ला “काळ्या” टोपीची “भगवी” करायला लावा- दिपक केदार

पुणे : संतोष बांगर या आमदाराने मी मुख्यमंत्री झाल्यावर पोलिसांना भगवी टोपी देऊ म्हणत थिल्लरपणा केला आहे.

यावर ट्विट करून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. पोलिसांच्या डोक्यावर भगवी टोपी आणू म्हणणाऱ्याची बौद्धिक क्षमता शून्य आहे. पोलिसांवर बोलण्या आधी पुजाऱ्यांच्या डोक्यावर भगवी टोपी घालून दाखवा!

हिंमत असेल तर आरएसएस च्या टोपीचा काळा रंग बदलून भगवा करायला लावा! भिडेला एक भगवी टोपी द्या, बघा तो घालतोय का? निघाले पोलिसांच्या टोपीचा रंग बदलायला. ते पोलीस आहे बैलाचा पोळा नाही. देशाची आचारसंहिता आहे, त्या नियमात बाधा आणयाचे काम करू नये. पोलिसांना सुद्धा अब्रू असते. पोलीस महासंचालकांनी अशा स्टेटमेंटची दखल घेऊन पोलिसांची अब्रू वाचवली पाहिजे!

स्वतः नागडं फिरायच अन् दुसऱ्याला वस्त्र घालण्याची भाषा करायची हे अक्कलशून्य विचाराचे द्योतक आहे. स्वतः हेपी वाढवायची अन् पोलिसांची टोपी भगवी करण्याची भाषा करायची हे अज्ञान आहे!

मी मुख्यमंत्री झालो तर राजकारण्यांना पोलिसांचा सालुट बंद करणार, स्वतंत्र भारतात कुणालाही गुलाम असल्याचे जाणवले नाही पाहिजे!

असे ही त्यांनी पँथरनामाशी बोलताना सांगितले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!