Uncategorized
भीमाकोरेगाव दंगलीतील गुन्हे मागे घेण्याची मागणी

औरंगाबाद : भीमाकोरेगांव दंगल व नांदेड येथील झालेल्या आंदोलन प्रकरणातील ३५ हजार भीमसैनिक तरुणांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथरसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. २०१८ला भीमाकोरेगांव दंगलीनंतर राज्यात विविध ठिकाणी पोलिसांतर्फे भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र आजपर्यंत हे गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. हे गुन्हे मागे घ्यावेत तसेच नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता करावी, हिंगोली येथील प्रेम प्रकरणातील दीक्षा नामक युवतीच्या आरोपींना फाशीची शिक्षा, दीक्षाच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, यासोबत विविध मागण्या करण्यात आल्या आहे. या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष बंटी सदाशिवे, जिल्हाध्यक्ष कमलेश दाभाडे, जितू रणशूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.