अग्रलेख

किराडपुरा दंगल आणि दोन हिरो..!

राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजी नगर शहरातील किराडपुरा भीषण राडा उसळला होता, यात पोलिसांच्या तब्बल 13 गाड्या, खाजगी दोन कार आणि जवळपास 7 मोटारसायकल जाळण्यात आल्या ही नेहमीची भीषणता दाखवणारी माहिती…

मात्र काळजाचा ठोका चुकवणारी माहिती अशी की या राड्यात शेकडो अश्रूधुराचे गोळे झाडण्यात आले, तब्बल 21 राउंड फायर करण्यात आले यात 11 प्लॅस्टिक बुलेट तर 10 लाईव्ह बुलेट फायर करण्यात आले, या राड्यात तब्बल 20 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत, राडा करणाऱ्यांपैकी दोन जण गोंधळात जखमी झाले तर एक जण पोलीस गोळीबारात जखमी झाला

वरील दोन परेग्राफ वाचल्यास राडा किती भीषण होता याचा अंदाज येतो पण राड्याला चिरत जाऊन दंगा शांत करणे ही बाब पोलिसांच्या जिवावरची गोळी असते, एकदा राड्यात घुसलं की परत येऊ की नाही याची शाश्वती देता येत नाही…

पण अशाही परिस्थिती या दंगलीला छत्रपती संभाजी नगर पोलीस दलाने मोठ्या हिमतीने तोंड दिलं, हा राडा दोन तासात नियंत्रणात आणला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे इतकी भीषणता निर्माण होऊनही हा राडा शंभर मीटरच्या पलीकडे पसरू दिलाच नाही, हे पोलिसांचं सर्वात मोठं यश होतं

यात शहरातील शेकडो पोलिसांचा सिंहाचा वाटा होता, यात पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर अशोक भंडारे, क्राईम ब्रँच पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, नीता बागवडे, संदीप गुरमे, संभाजी पवार, वेंकट केंद्रे, प्रशांत पोतदार, राजश्री आडे आणि असंख्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा होता…

पण आज मी मुद्दामूण दोन व्यक्तींबद्दल लिहिणार आहे यातलं पाहिलं नाव पोलीस आयुक्त निखील गुप्ता सर आणि दुसरं म्हणजे पोलीस निरीक्षक अशोक भंडारी सर…

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर यांनी शहराच्या आयुक्त पदाची धुरा स्वीकारल्यानंतर ते या शहरातले सर्वात यशस्वी पोलीस आयुक्त ठरले आहेत, कारण त्यांचा आतापर्यंतचा अडीच वर्षाचा काळ हा सर्वात महत्वाचा काळ आहे, कारण या काळात एकही दंगल झाली नाही आणि एकदाही राडा झाला नाही इतकंच नाही तर एकदाही तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नाही, ईश निदा काळात मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात दंगली उसळल्या पण छत्रपती संभाजी नगर शहरात साधा खडा सुद्धा उचलला गेला नाही. हे सांगण्याचं कारण एकच की या शहराला दंगलीचा कुदैदिप्यमान इतिहास आहे. दर सहा महिन्यातून एकदा तरी या शहरात दंगल होतेच मात्र गेल्या अडीच वर्षात एकदाही दंगल सोडा राडा सुद्धा झाला नव्हता, कालची घटना घडली खरी मात्र पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची तत्परता नियोजन आणि धाडस यामुळे ही घटना दोन तासात आटोक्यात अली आणि शंभर मीटरच्या पलीकडे पसरली नाही, आणि ही दगडफेक आटोक्यात आणताना कुठलंही नुकसान होऊ दिलं नाही सर्वात मोठी गोष्ट… अगदी अर्ध्या तासाच्या आत नियोजन करून पोलीस फोर्स असा काही डिप्लोय केला की राडेखोर लोक फक्त शंभर मीटर अंतरात चारही बाजूने कोंडले गेले, त्यानंतर अश्रूधुराचा मारा, प्लास्टिक गोळीबार आणि शेवटी जिवंत कडूतुसांची हवेत फायरिंग करून जमाव भयभीत करून पांगवला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेऊन झालेलं नुकसान तातडीने रस्त्यावरून हटवले सकाळी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या लोकांना इथे रात्री दंगल झाली होती याचा मागमूसही लागला नाही इतकी तत्परता दाखवली… हा असा मी पाहिलेला कर्तव्यतत्पर पोलिस आयुक्त पहिलाच….

पोलिस निरीक्षक अशोक भंडारी हे प्रचंड क्षमता असूनही अगदी काही दिवसांपूर्वी सेकंड इंचार्ज म्हणून सिटी चौक पोलीस ठाण्यात काम करत होते, पण इथे काम करत असताना त्यांचं डेडिकेशन प्रचंड होतं, सिटी चौक हे शहरातलं सर्वात अवघड पोलीस स्टेशन मानलं जातं, या अंतर्गत येणारे गुंड, आगाऊ वृत्तीचे लोक, अडचणी निर्माण करणाऱ्या वृत्ती, अशोक भंडारी यांना तोंड पाठ झालेल्या, त्यांची क्षमता गुणवत्ता धाडस आणि सचोटी पाहून निखिल गुप्ता सरांनी अशोक भंडारी यांना शहरातल्या आणखी एका अवघड जिंसी पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी गेल्या सहा महिन्यात अशोक भंडारी यांनी चोख पार पाडली काल जेंव्हा त्यांच्याच हद्दीत राडा उसळला तेंव्हा जमावाला निधड्या छातीने सर्वात आधी आडवा गेलेला हाच पहिला पोलीस अधिकारी, जमाव भेभान होताना 10 ते 12 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जमाव काबू करण्याचा अथक प्रयास याच अधिकाऱ्याने केला, परिसरातील मुल्ला मौलवी बोलावले त्यांना आवाहन करायला भाग पाडलं परिसर शांत ठेवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर गाड्या पेटल्या तरी चालतील पण माझे सहकारी जगले पजिजेत ही भूमिका घेऊन माघार घेण्याचा सुज्ञ पण दाखवला, मोठा पोलीस फोर्स दाखल होताच धाडसाची चुणूक दाखवत जमावावर असा काही प्रतीवार केला की बेभान झालेला जमाव कधी पळाला हे लक्ष्यात आलं नाही, मात्र जमाव पंगवताना कुठलीही जीवित्तहानी होणार नाही याचं सर्वोतोपरी भान ठेवलं, असे अधिकारी पोलीस दलात अनेक आहेत प्रसंग आला तर जीवाची बाजी लावून देशाचं समाजाचं रक्षण करतात, अशोक भंडारी हे पोलीस निरीक्षक असेच एक सच्चे आणि धाडसी अधिकारी आहेत.

दत्ता कानवटे,
छत्रपती संभाजीनगर..!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!