औरंगाबाद 843 जिल्हा परिषद शाळांची वीज कट केली, “घाम न फुटणाऱ्या दगडांना वीज अन् लेकरांना अंधार” असा सवाल दिपक केदार यांनी उपस्थित केला!

औरंगाबाद जिल्ह्यातील 843 जिल्हा परिषद शाळांची वीज कट केली आहे. आमच्या देशात घाम न फुटणाऱ्या दगडाला पंखा 24 मोफत वीज खाली चालू असतो, जिवंत लेकरांना कोंडमारा करून मारलं जातं. धार्मिक स्थळांना वीज मोफत पण शाळांची वीज कट हे तर गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेऊन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र आहे.
हिंदुत्व म्हणून सत्तेत बसलेल्यानी उत्तर द्यावे की या 843 शाळेत गरीब हिंदु नाही का? गरीब हिंदु तुमच्या हिंदूत्व अजेंड्यात कुठंय? देशाचे हे स्थान करणार, ते नगर करणार अहो, राज्याचं लाजस्थान केलंय त्यावर बोला. लाज वाटायला पाहिजे देशाचे उद्याचे भविष्य तुम्ही अंधारात घालताय.
मागे बबनराव लोणीकर या मंत्र्याच्या घरातली वीज कट केली, ऑडियो वायरल झाली, महावितरण कर्मचाऱ्याला शिव्या घातल्या. जिल्हा परिषद शाळा बंद पडून धन दांडग्यांच्या शाळा खोलून बहुजन अंधारात घालायचा अजेंडा आहे. धार्मिक स्थळांना वीज मोफत अन् शाळांना वीज विकत हे थांबवा आणि जिल्हा परिषद शाळेला वीज मोफत द्या अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली. भारताचे लोक या चॅनेलला प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले.