महाराष्ट्र

औरंगाबाद 843 जिल्हा परिषद शाळांची वीज कट केली, “घाम न फुटणाऱ्या दगडांना वीज अन् लेकरांना अंधार” असा सवाल दिपक केदार यांनी उपस्थित केला!

औरंगाबाद जिल्ह्यातील 843 जिल्हा परिषद शाळांची वीज कट केली आहे. आमच्या देशात घाम न फुटणाऱ्या दगडाला पंखा 24 मोफत वीज खाली चालू असतो, जिवंत लेकरांना कोंडमारा करून मारलं जातं. धार्मिक स्थळांना वीज मोफत पण शाळांची वीज कट हे तर गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेऊन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र आहे.
हिंदुत्व म्हणून सत्तेत बसलेल्यानी उत्तर द्यावे की या 843 शाळेत गरीब हिंदु नाही का? गरीब हिंदु तुमच्या हिंदूत्व अजेंड्यात कुठंय? देशाचे हे स्थान करणार, ते नगर करणार अहो, राज्याचं लाजस्थान केलंय त्यावर बोला. लाज वाटायला पाहिजे देशाचे उद्याचे भविष्य तुम्ही अंधारात घालताय.

दिपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना प्रतिक्रिया

मागे बबनराव लोणीकर या मंत्र्याच्या घरातली वीज कट केली, ऑडियो वायरल झाली, महावितरण कर्मचाऱ्याला शिव्या घातल्या. जिल्हा परिषद शाळा बंद पडून धन दांडग्यांच्या शाळा खोलून बहुजन अंधारात घालायचा अजेंडा आहे. धार्मिक स्थळांना वीज मोफत अन् शाळांना वीज विकत हे थांबवा आणि जिल्हा परिषद शाळेला वीज मोफत द्या अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली. भारताचे लोक या चॅनेलला प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!