चळवळ

जिल्हाधिकारी “अशोक चक्र” नसलेला झेंडा लावतो कसा? हे देशद्रोही मोठं कटकारस्थान – दिपक केदार

फेसबुक पोस्ट : अशोक चक्र नसलेला झेंडा लावलाच कसा?
हे देशद्रोही कृत्य नाही का? औरंगाबाद जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण उत्तर द्या!
अचानक 2022 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशभर भारताच्या झेंड्यातून अशोक चक्र हटवण्याचे कृत्य दिसत आहे. हर घर तिरंगा नावाखाली करोडो झेंडे निर्मितीचे कॉन्ट्रॅक्ट गुजरात मधील काही कंपन्यांना देण्यात आले. त्या कंपन्यांनी जाणिवपूर्वक अशोक चक्र नसलेले झेंडे सुद्धा बनवलेत, अशोक चक्र मधील भागातून कॉर्नर ला आणलेत हे सर्व सुनियोजित आहे. विटंबना करण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य आहे.
औरंगाबाद येते मोठा कार्यक्रम पार पडला यात जिल्हा अधिकारी यांनी घेतलेल्या कार्यक्रमात भारताचा झेंडा असलेला backdrop दिसत आहे. त्यात अशोक चक्र नाही हे लक्षात आल्यावर समग्र भारतीयांच्या मनात संताप आणि आश्चर्यकारक प्रश्न निर्माण झालेत की एवढा जबाबदार संवैधानिक पदावर बसलेला अधिकारी असे कृत्य करतोच कसा?
अचानक अशोक चक्र नाकारणे हा देशद्रोह आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ देशाची माफी मागावी, जे जे लोकप्रतिनिधी तिथे होते त्यानी सुद्धा माफी मागावी अन्यथा या विरोधात आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही.
जिथे जिथे अशोक चक्र नाकारले आहे तिथे तिथे संबंधितांवर देशद्रोह अंतर्गत कार्यवाही करावी.
अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे. असल्याचे मत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी सवाल केला आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!