समाजहितासाठी उच्च तळमळ – धीरज धुळे

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष , आमचे आधारस्तंभ~मार्गदर्शक , संघर्षनायक आयु . दिपकभाई केदार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..! समाजहितासाठी उच्च तळमळ , शोषित-पीडित , अन्यायग्रस्त व्यक्ती अथवा समुहाला न्याय देण्याची प्रचंड धडपड , समाजपयोगी कार्य करताना स्वतः ची स्वतःच्या कुटूंबाचीही पर्वा न करता आंधळ्या , दृष्टीहीन , निर्दयी , जातीवादी , मनुवादी , हिटलरशाहीसम सरकारच्या व्यवस्थेविरोधात समाजरक्षक म्हणून विद्रोही बंड पुकारून लढणारा शूर युगंधर लढवय्या पँथर म्हणजे आमचे दिपकभाई केदार . गेल्या काही वर्षांपासून मोजक्या सहकाऱ्यांसोबत स्थापन झालेल्या या संघटनेचे आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही लाखोने समर्थक निर्माण झाले आहेत . यांस कारण भाईंची समाजहितासाठीची अखंड कार्यक्षमता , रात्रंदिवस समग्र महाराष्ट्रभर फिरून शोषित~पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याची भूमिका . खरं तर या पँथर चळवळच्या वृद्धी आणि विकासामध्ये प्रमुख श्रेय हे भाईचेच राहिले आहे . संघटना स्थापन झाल्यापासूनच्या अवघ्या काही काळापासूनच भाईंसोबत काम करण्यास मी सुरवात केली . निस्वार्थ , प्रेमळ भाईंचा स्वभाव आहे . कार्यकर्त्यांच्या अडचणीपण भाई सोडवतात . फार संकटातून मात करून भाईंनी ही चळवळ उभी केली आहे व त्याबरोबरच ती चळवळ जपली देखील आहे . संविधान संरक्षणाचा लढा , गायरानांचा लढा , स्त्रीयांवरील अत्याचाराचा लढा , आरक्षण वाचवण्याचा लढा , ऍट्रॉसिटी बळकट करण्याचा लढा , अरविंद बनसोड हत्याकांड लढा , भीमराज गायकवाड हत्याकांड लढा , विराज जगताप हत्याकांड लढा , सागर शेजवळ हत्याकांड लढा असे अनेक दलित हत्याकांडातील प्रमुख लढे भाईनी सामाजिक माध्यमांवरतीच न लढता रस्त्यावर , मैदानावर , विधानभवनासमोर आंदोलनात्मक विद्रोही भूमिकेतून लढला आहे . अत्यंत तरुण वयामध्ये समाजासाठी संघर्ष करण्याचा भार जर कोणी खांद्यावर घेतला असेल तर तो खरा संघर्षनायक म्हणजे आयु . दिपकभाई केदार . भाई आपणास दीर्घ आयुष्य लाभो..! समाजहिताचे कार्य नेहमी आपल्या हातून घडो..! हीच तथागताचरणी माझी प्रार्थना..!