एक नाव सध्या या देशाच्या राजकीय पठलावर गाजत आहे, अर्थातच दिपकभाई केदार

एक नाव सध्या या देशाच्या राजकीय पठलावर गाजत आहे…. अर्थातच #दिपक भाई केदार कोणतीही राजकीय पाश्वभूमी नसताना घेतलेली गगन भरारी अत्यंत कौतुकास्पद आहे.भल्या भल्या प्रस्तापित नेत्याची हवा निघाली याच तरुण नेत्यामुळे..समाजातील लोकांच्या सहकार्याशिवाय इतका मोठा पल्ला पार करणे शक्य न्हवते.समाजातील सर्वच घटकाचा त्यांच्या डोक्यावर हात आहे व पाठीवर कौतुकाची थाप आणि आपलेपणाची साथ आहे.सर्वात जास्त बुडाला आग लागली ती आपल्याच काही वरिष्ठ नेत्यांना..लागणारच कारण आपल्यापेक्षा कोणी दुसरा नकोच ही घाण मानसिकता असो तर मग आपल्याच घरातील असो ही सोच असते ह्यांची.काही वर्षा अगोदर मी आयकल होत की आता आंबेडकर चळवळ संपली परंतु मी छातीठोक पणे सांगू शकतो कीपॅन्थर दिपक भाई केदारने संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ वाढवून आणखी गतिमान केली आहे. प्रत्येक घराघरात एक जहाल पॅन्थर तयार केला आहे.आंबेडकर चळवळ ना कधी संपली होती ना कधी संपणार..प्रस्थापित नेत्यासोबत काम करून त्यांची गुलामी करण्यापेक्षा दिपक भाई केदार सोबत काम करणं मला अभिमानास्पद वाटते..स्वतंत्र विचार सरणी, आंबेडकर वादी विचारधारा व दुःखी पिढीत समाजासाठी लढा.म्हणजे आपल्या हक्काचं संघटन.इथे संपूर्ण आझादी आहे.ना कोणी साहेब ना कोणी बॉस विशेष म्हणजे आमचा मालक कोणीच नाही.आम्हीच आमचे मालक आहोत.संघटनेचा प्रत्येक पॅन्थर खुट्याला बांधलेला नाही तो मोकळा आहे. त्याचे विचार मांढण्याचा त्याला पूर्ण स्वतंत्र आहे..कित्येक वर्षानंतर समाजाला दिपक भाई केदार सारखं कणखर नेतृत्व मिळालं आहे. या निर्भीड नेत्याला आपल्याला जपावं लागेल त्यांना साथ द्यावीच लागेल कारण सद्याच्या वेळेला कोणी मराठा समाजाचा विचार करते तर कोणी ओ. बी. सि. समाजाचा विचार करते समाजाचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना दुसऱ्या समाजाची हुजूरेगिरी का??समाजाच्या दुःखात धावून जाणारा एकमेव नेता आपला दिपक भाई…..#दिपकभाईकेदार आज भाईंचा वाढदिवस वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!साहेब आपलाच…
- दिपक पंजाबराव वंजारी नवी मुंबई