चळवळ

चौथ्यापर्वाचा बंड पुकारून निधड्या छातीने संघर्षनायक दिपक भाऊ केदार लढतोय!

#पँथरराजे दीपक भाऊ केदार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने क्रांतिकारी जयभीम !! रात्र वैर्याची आहे, जागी रहा, पेंटून उठा ,बंड करा म्हणत उपेक्षितांनवर,पिढीतांनवर,वंचितांनवर दिवसांन दिवस वाढत चाललेल्या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक आन्यायावर न्यायाची धार लावण्यासाठी , चौथ्यापर्वाचा बंड पुकारून निधड्या छातीने संघर्षनायक दिपक भाऊ केदार अख्या महाराष्ट्रभर सामाजिक न्यायाची भूमिका बजावत निळे वादळ घेऊन नेहमी आपल्याला रस्त्यावर दिसेल.अतिशय तळमळीने लढणाऱ्या ह्या योध्यास समाज ओळखून आहे. प्रस्थापितांना हादरे देणारा भीमाचा वाघ निर्भीडपणे समाजाची जाण ठेवून बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन क्रांती करणार ती क्रांति आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येईल. एका खऱ्या आंबेडकरवाद्याला संघर्ष करावाचं लागतो आणि तो संघर्ष त्यांच्या पाचवीला पुंजला असतो. कारण.. तो कुणाचा बटीक नसतो, तो कुणाचा गुलाम नसतो, तो दीड दिवसात उदयास आलेला नसतो, त्याच्याकडे कुणी सेटिंग लावून दिलेली मीडिया नसती , तो कोणत्या प्रसिद्धीसाठी लढत नसतो, तो कोणत्या संपत्तिसाठि भांडत नसतो.तो फक्त महामानवाचे उपकार हृदयात, डोख्यात ठेवून, चांगल्या नैतिकेने नीतिमत्तेने समाजासाठी पोटतीडकिने भिड़त मनुवाद्यांच्या विचारांना सुरुंग लावतो.अश्या लढवय्या दमदार नेतृत्वाची गरज समाजाला असतांना देखील समाजाची दिशाभूल करण्यास काही मंडळी मग्न असते. काहींना भीती असते सामाजाच्या नावाने चालनारी आपली दुकान बंद होती की काय? काहींना भीती असते की जे आम्हाला वर्षानुवर्षापासून मिळवता आलं नाही ते यांना मिळते की काय? काहीं प्रस्थापितांना भीती असते जे आमच्या युवकांना जमलं नाही ते ऊसतोड कामगारांचा मुलगा करतो की काय? दीपक भाऊ केदार यांच्यासोबत काम करत असताना एक प्रसंग मला आवडीने मांडवासा वाटतो, कायगाव, वैजापूर येथील प्रेम प्रकरणातील इंटर कास्ट मॅरेज मधील अतिशय घाबरलेल्या अवस्थेत नवं प्रेमी जोडपे आम्हाला भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आमच्याकडे आले.मुलगा अनुसूचित जातीचा असून मुलगी ही सुवर्ण जातीची होती.मुलीकडील परिवार पैशाने, राजकारणाने धन धटका शक्तिशाली होता.आजही डोळ्या समोर तो प्रेमी जोडप्यांचा प्रसंग मला आठवतो.प्रेमी जोडपं आमच्यासमोर धसा धस एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागले. आम्ही जर एकमेकांपासून दूर गेलो तर आम्ही आमच्या दोघांच्या जीवाचे काहीही करू म्हणले..मुलाला पकडण्यासाठी पोलीस कामाला लावले, गुंडे कामाला लावले. परंतु प्रेमी जोडपं तात्काळ आमच्या संपर्कात येऊन सुरक्षित होते. प्रेमी जोडप्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न मुलीकडच्या परिवाराने केले. मुलाच्या परिवारावर हल्ला चढवत मुलावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.प्रेमी जोडप्यांच्या निरागस चेहऱ्यांना बघून दीपक भाऊंनी त्यांना धीर दिला.आणि मग नेता आमचा पावरफुल.. तात्काळ पॅंथर यंत्रणा कामाला लावली. तातडीने पोलिसांना धारेवर धरत मुलाच्या कुटुंबांना सुरक्षा पुरवली व मुलीकडच्या आरोपींना पाव बंद केले. आणि इंटर कास्ट प्रेमी जोडप्यांच्या लग्न वाटचालीस रस्ता मोकळा करून दिला.आता ते प्रेमी जोडपे सुखरूप पद्धतीने आपले जीवन जगत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांने प्रगल्भ असलेले आमचे नेते दीपक भाऊ केदार यांना खरंच मानावे लागेल. मारणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ तारणारा असतो हे बुद्ध विचारांनी दीपक भाऊ केदार यांनी प्रेमी जोडप्यांना वाचून पुन्हा एकदा सिध्द केले , मानवतेचा संदेश दिला.परत एकदा थोडक्यामध्ये एक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न करतो.उस्मानाबाद जिल्ह्यातील फासेपारधी समाजाचा पप्पू काळे या युवकाला अतिशय बेरहीमिने संशय घेऊन जातीवादी मानसिकतेतून हळहळ करून मारून टाकण्यात आले होते.उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षांनी दौऱ्यावर असताना दीपक भाऊ केदार यांना माहिती दिली.तात्काळ दीपक भाऊ यांच्या सोबत आम्ही घटनास्थळी त्या गावांमध्ये दाखल झालो.रात्रीचा वेळ होता. संपूर्ण गाव पप्पू काळे यांच्या हत्ये बद्दल रागाने खद खदत होतं, मोठमोठ्याने बोंब्या घेत रडत होते. प्रत्येक घरामध्ये रागाच्या भरात असलेला सनसनाट होता.भयभीत व भयानक अवस्थेत असलेला गावकऱ्यांचा नजारा आम्हाला पाहायला मिळाला.आम्ही थोड्याफार प्रमाणात घाबरलेल्या अवस्थेत होतो.फासेपारधी म्हटल्यावर सामाजिक परिपक्वता कमी असलेल्या समाजामध्ये दीपक भाऊ केदार हे एकटे निडरपणे उभे होते.तातडीची दीपक भाऊ केदार यांच्याकडून न्यायाची भूमिका घेण्यात आली.पोलिसांना धारेवर धरले , गावकऱ्यांना न्यायाचा धीर दिला.आरोपींवर कारवाई करण्यास दबाव टाकला. पुन्हा एकदा नव्याने पिढीताना, गावकऱ्यांना न्यायाचा दीपक मिळाला. आणि मग जोरात आवाज झाला. ‘आंबेडकर साहेबांचा विजय असो” “आंबेडकर साहेबांचा विजय असो” अश्या पद्धतीने फाशे पारधी समाजाने बाबासाहेबांच्या घोषणा दिल्या.वर्षानुवर्षापासून खचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून ताकद देण्याचे काम ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या न्याय प्रणालीवर चालणाऱ्या पॅंथर योध्यांनी केले.असे अनेक प्रसंग चळवळीत दीपक भाऊ केदार यांच्यासोबत काम करताना माझ्यासमोर आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षशाली कार्याला उजाळा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.परिवर्तनाची गती वाढविण्यास “आता महामानवाचे विचार समजून घ्यावे लागेल, समाजहितासाठी संकुचित भावना सोडावी लागेल, बंधू भावना ओढावी लागेल,माणसं माणसाला जोडावी लागेल,” आणि दीपक भाऊ केदार सारख्या दमदार नेतृत्वाला साथ देणे ही काळाची गरज असेल ..!!

भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या कार्याला तुमच्या पँथर सैनिकाचा जयभीम व शुभेच्छा!!

ऑल इंडिया पँथर सेना

महाराष्ट्र प्रवक्ता

– बंटी दादा सदाशिवे. ✍️

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!