अटक करा अन्यथा नोकऱ्या घालू – दिपक केदार

जेकेकुर उमरगा बौध्द तरुण आदेश जेठेथोर यावर आठ जणांनी सशस्त्र जीवघेणा हल्ला केला यात त्याच्या पोटात वार झाले आहेत. भिमजयंती मिरवणुकीत समाजकंठकानी धुडगूस घातला त्यांना रोखण्याचे कार्य या भीमसैनिकाने केले होते. वीस दिवसांनी जिल्हा परिषद शाळेत बोलवून हल्ला करण्यात आला.
आज गावात आणि हॉस्पिटल मध्ये भेट दिली.
🔴 आठ आरोपी आहेत अद्याप त्यातील सात आरोपी फरार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे.
🔴 खोलवर घाव असताना पोलिसांनी यात 307 कलम लावले नाही. 24 तास एफआयआर घेतली नाही, डॉक्टरांनी mlc लवकर दिली नाही, पीडित देत असलेल्या जबाब बदलण्याचा प्रयत्न सुरू होता यामागे कुणाचा हात आहे. आरोपी चार दिवस झाले तरी अटक का नाहीत.
🔴 पोलिस निरीक्षक आणि डीवायएसपी चे निलंबन झाले पाहिजे, प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.
🔴 आदेशला भेटलो त्याला जेवण जात नाही, श्वास घेण्यास त्रास होतोय, एक घाव बरगडी पर्यंत गेल्यामुळे त्याला त्रास होतोय, त्याचा जीव वाचवण्यासाठी दर्जेदार इलाजाची गरज आहे.
🔴 पीडित तरुणाला काही झाल्यास राज्य वेठीस धरले जाईल, त्यामुळे त्याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे.
🔴 आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालय येते मोठा मोर्चा काढून राज्यव्यापी आंदोलन छेडणार.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी आणि यात ज्या पद्धतीने पुण्याच्या केससाठी सगळे धडपडत आहेत, त्याच धर्तीवर ही केस सुद्धा हाताळली पाहिजे.
पीडित कुटुंबाची भेट घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी गावात निषेध नोंदवून मोठ्या रैलीने उमरगा एंट्री केली. अचानक आलेल्या ताफ्याने उमरगा शहरात वातावरण तापले होते. उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष धनंजय हुंबे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे, नळदुर्ग, कर्नाटक, आजूबाजूच्या गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.