Uncategorized

गरीबांच्या गायरानात घुसणाऱ्या जेसीबी चा चुराडा करू – दिपक केदार

नागपूर : हजारो कार्यकर्ते धडकले हिवाळी अधिवेशनावर, जोरदार घोषणाबाजी, आक्रोश दिसत होता. इंदोरा मैदान येथून निघालेल्या मोर्च्यात महिलांची संख्या मोठी होती, या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले.
यावेळी दिपक केदार यांनी सरकारला इशारा दिला. गायरान गरीब कुटुंबांचे आधार आहे, त्यांच्या तोंडचा घास ओडू नका, त्यांच्या झोपड्या पाडू नका. 2022 पर्यंत गायरान नियमित करून सातबारा द्यावा. तहसीलदार नोटीस देत आहे त्यांना आवरा, काय भूमिका घेइची ती घ्या एवढं लक्ष्यात ठेवा उद्रेक आहे. पँथर गायरान धारकांच्या पाठीशी आहे याद रखा, गायरान काढण्यासाठी जेसीबी आला तर त्याचा चुराडा केला जाईल अशा अशा इशारा देत आहोत.

मागण्या करून थकलो आहोत आता जसाचे तसे उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. सरकारला सत्तेची मस्ती चडलेली त्यांना संवेदना राहिलेल्या नाहीत, दलित अत्याचारावर मूग गिळून बसले आहेत. आमचे मुडदे पडत आहेत, राज्यात दलित अत्याचारावर कुणीही बोलत नाही.

एकमेव ऑल इंडिया पँथर सेना लढत आहे त्यामुळे लक्ष्यात घ्या, अमुक शक्ती तमुक शक्ती ही केवळ चर्चा आहे. खरी भीमशक्ती ही पँथरशक्ती च आहे.

सहा दिवस झालं अधिवेशन भरलय काहीही राज्याच्या हिताचे घडत नाही केवळ उनेधूने काढून वेळ घातला जातोय. शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, दलित यांच्या प्रश्नांवर गप्प गार आहेत. रोज एक सस्पेन्स सुरू आहे हा म्हणतो मी बॉम्ब फोडेल तो म्हणतो मी बॉम्ब फोडेल यांचा बॉम्ब म्हणजे एकमेकांच्या under pant ची कंपनी कोणती हे शोधणे हा यांचा बॉम्ब, एकमेकांना भोंगळ करण्यात जास्त यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे हे अधिवेशन कसलं हे तर बिगबॉस चे घर झालं आहे.

यांना अणुबॉम्ब काय असतो ते जनता दाखवले यांची सरकार जन आक्रोश अणुबॉम्ब लावून उद्ध्वस्त करू!
बुद्ध लेण्यावरील देवी देवतांचे अतिक्रमण तात्काळ काढा आता आमचा अंत संपलाय ऑपरेशन राबवून कचरा उचलून फेकण्याचे काम आम्ही हाती घेऊ याची दखल घ्या.
यांच्याकडून अपेक्षा नाहीत, लोकात जाऊन यांचा खरा चेहरा उघडा पडला जाईल. बेरोजगारांना नोकरी नाही तर ऑनलाईन रम्मी दिली खेळायला तात्काळ ही रम्मी सट्टेबाजी बंद करा. बेरोजगार तुम्ही जुगार केलाय.

समृध्दी महामार्ग टिमकी वाजवली जाते, आदिवासीं त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नाही त्यांच्या तांड्याला रस्ते नाहीत, घर नाहीत विकास असा उरफाटा आहे ज्यात आदिवासी दलित वंचित आहे.

आजही रमाई घरकुल म्हंटले जाते घरकुलाचा जमाना राहिला का? रमाई बंगला असं का योजनेचे नाव होतं नाही, तात्काळ रमाई बंगला योजनेला 5 लाख रुपये प्रति घर रक्कम जाहीर करा!

समाजाच्या 75 मागण्या घेऊन आलेली आपली एकमेव संघटना आहे. तळमळ आहे म्हणून लढतोय, ही लढाई आता येणाऱ्या काळात व्यापक होणार तिथे पँथर गेल्याशिवाय हे मुतणार नाहीत. राखीव मतदार संघातून निवडून गेलेले बटिक शंड झालंय.

दोन महिन्यात दलित अत्याचार, गायरान जमीन, बेरोजगारी, अनुशेष, स्वधार, शिष्यवृत्ती, भिमाकोरेगाव राष्ट्रीय स्मारक अशा सर्व मागण्यांवर भूमिका घेतली नाही तर मुंबई अधिवेशनावर हा निळा जन उठाव लाखोंचा असेल हे लक्ष्यात घ्या, त्यावेळी तुम्हाला खरा फिक्चर दाखवून देऊ!

  • ऑल इंडिया पँथर सेना

AllindiaPantherSena

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!