राजकीयराष्ट्रीय

संसदेच्या आवारात भोंदू घुसखोर वाढले – दिपक केदार

संसद, राष्ट्रपती भवन, मंत्रालयाच्या आवारात घुसलेल्या घुसखोरांना रोखा, हे तेच आहेत ज्यांनी बळीराजाची हत्या केली अन् बळीचे राज्य हिरावून घेतले!
छत्रपति संभाजी महाराज संपवले त्यांची सत्ता याच प्रवृत्तीने हिसकावून घेतली. त्या प्रवृतीचा नायनाट भिमाकोरेगाव येते सिदनाक महारांच्या नेतृत्वातील सामाजिक स्वातंत्र्याच्या लढयाने घेतला.
आज त्याच सिदनाकांचे वारसदार या नात्याने आम्ही सतर्क करतोय. हे घुसखोर राष्ट्रपतींच्या डोक्यावर काही तरी टाकून बडबडताना दिसले, वादग्रस्त स्तंभाच्या उभारणी वेळी दिसले, नव्या संसदेच्या पायाभरणी वेळी सुद्धा दिसले, महाराष्ट्रातील मंत्रालयात सुद्धा त्यांनी “मुख्यमंत्री खुर्चीवर बसा दिनी” काही तरी केलं, त्यामुळे संसदीय प्रणालीचे मंदिर होण्यास वेळ लागणार नाही. मंत्रालय, संसद, राष्ट्रपती भवन येते घंट्या वाजायला वेळ लागणार नाही.
धर्मनिरपेक्ष, एकात्मता ही उद्धवस्त होत आहे. संविधानाची पायमल्ली होत आहे. कोर्ट थोड्या थोड्या मुद्द्यांवर लक्ष देते मग या घुसखोरीवर भूमिका का घेत नाही? असा प्रश्न ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

One Comment

  1. ओंल इंडिया पॅंथर सेना जालना जिल्हा आय टी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!