Uncategorizedअग्रलेख

धारावी अजगर गिळणार!

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी हे आपण नेहमी वाचतो. धारावी लीहिण्या आधी आशिया खंडाचा उल्लेख करावाच लागतो.
दहा महिन्यापूर्वी ही झोपडपट्टी विकसित करण्याच्या नावाखाली आडाणी ग्रूपला दिल्याचे आता समजले आहे. हेडनबर्ग ने भयानक आरोप लावलेले तेच आडाणी ज्यांच्यावर देश विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदींचे विश्वासू म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी बोट ठेवलं ते त्यांना मिळालं हेच गेल्या नऊ वर्षात देश चिमुटपने बघतोय. नऊ वर्षांपूर्वी हे नाव कुणीच ऐकलेले नाही. प्रत्येक आंदोलनात या नावावर टीका होतेच होते.
5000 कोटी मध्ये धारावी विकसित करण्यासाठी आडाणी ला दिली आहे. गेल्या वर्षी दुबई तील एका कंपनीने हाच प्रोजेक्ट्साठी जवळपास 7500 कोटीची बोली केली होती तरी सुद्धा राज्य सरकारने 2500 कोटी फायदा होत असताना आडाणी चे टेंडर फायनल केले.
धारावी आता गिळण्याची मोठी तयारी झालेली आहे. कामगारांचा, मजुरांचा, बेरोजगारांचा, शोषितांचा आक्रोश सुरू झालेला आहे. आता डोळ्यात पाणी येऊ लागलंय लवकरच हंबरडा फोडून रडणारे व्हिडिओ पुढे येतील पण निर्दयी व्यवस्थेला फरक पडणार नाही. आपल्या जावयाला गिळायला जे जे देता येईल ते ते दिले जाणार आहे. त्यांना आम्ही नाखूष करू शकत नाहीत, हेच एकंदरीत ठरलेलं आहे.
मोर्चे सुरू झालेत, आंदोलने सुरू झालेत पण त्याचा काही एक फायदा होणार नाही. सत्ताधारी विरोधक एकच असल्याचे आता झाकून राहिलेले नाही. मोदी शहा यांचे निकटवर्तीय असलेले आडाणी हे शरद पवार यांच्याही फार जवळचे आहे, त्यांचे रोहित पवार तर गाडी चालवताना दिसले. आडाणी विरोधात सगळे एकमुखाने बोलत नाहीत, कुणी ना कुणी तिथे शरण झालाय हे नाकारून चालणार नाही.
धारावीची या आडून जागा गिळण्याचा डाव आहे. काहीही परिवर्तन होणार नाही. अजगर गिळून मोकळा होईल यापलीकडे काहीही होणार नाही.
पुनर्वसन कसे करणार? मोबदला काय देणार? मोबदला कुणाला देणार? याची कसलीही प्लॅनिंग नाही. ज्या शोषित घटकांचे नेतृत्व येथील अनेक पक्ष संघटना करतात त्यांची बैठक राज्य सरकारला घ्यावी वाटली नाही. विकासासाठी काही सुचवावे असे यांना वाटत नाही. रहिवाश्यांना विश्वास दिला नाही. सरकार निर्बुद्ध झालेली आहे का? धारावी आडाणीला देऊन मोकळं झाले.
धारावी उद्धवस्त होणार तिथे आता कोंडवाडा उभा राहील, जनावरं कोंडल्यासारखे लोक कोंडली जातील. जे एसआरए चे सुरू आहे तेच येथेही होणार.
धारावी विकसित होणार पण कशी होणार? 20000 हजार उद्दोग धारावीत सुरू आहेत, 2.5 लाख कामगार तिथे काम करतात, 3 लाख कुटुंब भाडेकरू आहेत. भाडेकरू कुटुंबाला घर कसे देणार? धारावीत लाखों लोकांकडे कागदपत्र नाहीत, त्यांचे पुनर्वसन कसे करणार? विकसित च्या नावाखाली कामगार, गरीबांना देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे का?

काल एक नेता म्हणतो स्टेलमेंट साठी मोर्चा काढला असेल, मग मोर्चा न काढणारे स्टेलमेंट करून बसलेत का? याच उत्तर द्यावे. आडाणीने राज्यातले अनेक पक्ष विकत घेतले असल्या सारखे चिन्ह आहे त्यामुळे त्याच्या विरोधात भले भले बोलत नाहीत. मरण मात्र गरीबांचे आहे. धारावीत पुन्हा लॉकडाऊन सारखी स्तिथी होणार, जत्थे परत गावी निघून जाणार, लाखों लोक बेघर अन् बेरोजगार होणार. 7 वर्ष प्रोजेक्टसाठी लागणार आहेत, सर्वात आधी बुलडोझर चालणार आहे. विकसित होण्या आधी ती भुईसपाट केली जाईल. हे बुलडोझर ज्या दिवशी येईल त्यादिवशी हातावर पोट असलेल्या गरीबांचा आक्रोश आशिया खंडातील सर्वात मोठा आक्रोश असेल तेंव्हा बधीर झालेल्या व्यवस्थेला गाड झोप लागलेली असेल.
सात वर्ष लोक कुठे राहणार? त्या 20 हजार छोट्या उद्दोगांचे काय होणार? ते 2.5 लाख कामगार काय करणार? त्याचे घर कसे चालणार? याचं कोणतही धोरण सरकारने बनवलेले नाही.
दहा महिन्यांपूर्वी धारावीची बोली लागली, तेंव्हा दुबई च्या कंपनीने 7500 कोटी रुपयांची ऑफर केली त्याच वेळी आडाणी ग्रुपने 5000 कोटी ऑफर केली. 2500 कोटी जास्तीचे सोडून आडाणीलाच हे विकासाचे काम देण्यामागे काय धोरण असेल? पैशांच्या बळावर निवडणूका लढवल्या जातात आणि तो पैसा पुरवण्याचे काम उद्दोजक करतात.
धारावी उद्धवस्त म्हणजे मुंबई उद्धवस्त होणार. देशाचे पंतप्रधान म्हणतात सुरतचा विकास झाला तर गुजरातचा विकास होईल, गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. सुरतला मुंबई करण्याचा अजेंडा आहे आणि मुंबई उद्धवस्त करण्याचे आडाणी हस्ते धोरण आहे हेच सत्य आहे. कायम मुंबई डोळ्यात सलत आली आणि स्वार्थी राजकारण्यांनी कायम मुंबई थोडी थोडी विकण्याचेच काम केले. उद्दोजकांपुढे गुडघे टेकवणारे आता मुंबईला वाचवायला सक्षम नाहीत हेच सत्य आहे.

अतिमहत्वाचं; मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हा एका बाजूला धार्मिक दंगे सुरू होते. रस्त्यावर मोठं मोठे होर्डिंग्ज होते, त्यामुळे लोकं त्या दंग्यात दंग केले अन् मित्र आडाणीला मच्छिमारांची किनारपट्टी विकून टाकली हे दहा महिन्याने जेव्हा मच्छीमारांचा आक्रोश ऐकू आला तेंव्हा समजले. आज महाराष्ट्रात तोच पॅटर्न राबवला जातोय, ऐकिकडे आरक्षण आंदोलन सुरू करून दुसरीकडे धारावी आडाणी ला देऊन टाकली ती दहा महिन्यानंतर लोकांना माहीत झालं. एक कायम लक्ष्यात ठेवा, जेव्हा जेव्हा राज्यात धार्मिक वाद सुरू असतो, तेव्हा तेव्हा पडद्यामागे आडाणी ला काहीना काही विक्री सुरू असते हे सिद्ध झालं!
अंबानींच्या घरी गणपती बसतो, लग्न असते तर रांगेत नेते तिथे जाऊन जणू मुजराच करतात. भांडवलदारांचे गुलाम झालेले नेते लोकशाहीला भांडवलशाही च्या दावणीला नेऊन बांधून टाकतात, यापेक्षा दुर्दैव काय?
धारावी नेस्तनाबूत करून शोषित गरीब उद्धवस्त केला जाणार, धारावी अजगर गिळून घेणार..
धारावी बचाव! कामगार बचाव!! मुंबई बचाव!!!

  • दिपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!