ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी भूमीहीन शेतमजुरांना 25 हजाराची मदत द्या – दिपक केदार

पुणे : विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण गाजले. शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार प्रती हेक्टरची मदत करण्याची मागणी त्यांनी जोरात लावली. याच भूमिकेचा धागा धरून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी विरोधी पक्ष नेता व मुख्यमंत्री या दोघांना टार्गेट केले आहे. शेतीत पाणी साचले, ओला दुष्काळ, महापूर यात तुम्ही सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत आहात तुम्ही याच शेतीवर आधारित मागासवर्गीय भूमिहीन मजुरांचा विचार का करत नाहीत. त्याला आठवडी बाजार नाही, त्याच्या आत्महत्येची नोंद सुद्धा होत नाही. संवेदन मनाने कधीही कोणत्याही मंत्र्यांनी आमची बाजू मांडली नाही. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भूमिहीन मजुरांना 25 हजार प्रत्येकी मदत जाहीर करावी, मागासवर्गीय बेरोजगारांना 10 हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केली आहे.