विरारमध्ये भीमजयंती मिरवणूकीनंतर विजेचा शॉक लागून 2 भीमसैनिक शहीद झाले!

विरार : विरार मध्ये भीम जयंती आटपून घरी निघालेला मिरवणुकीतील बंजो आणि बंजोला असलेला निळा झेंडा लोखंडी होता तो लोखंडी झेंडा विजेच्या ट्रान्सफॉर्मर ला लागला आणि एकच स्फोट झाला यात सात भीमसैनिक भाजले. दोघे जागीच शहीद झाले मृत्यूमुखी पडले. 3 जण गंभीर आहेत. ही घटना राज्याला हादरून टाकणारी घटना आहे. वसई, विरार, नालासोपारा भागात शोक व्यक्त होत आहे.
यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी माहिती घेतली. पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज खाडे यांनी सर्व माहिती दिली आहे. आणि या घटनेकडे त्यांचे लक्ष आहे.
दिपक केदार यांनी मागणी केली आहे की, ही सुद्धा दुर्दैवी घटना होती पण कुणीही मंत्री किंवा विरोधक त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. जखमींना विचारपुस करायला गेलेले नाहीत आणि मृताच्या नातेवाईकाना कसलही आर्थिक पॅकेज जाहीर केलेले नाही हे संतापजनक आहे. खारघर प्रकरणी तात्काळ मदत दिली आणि पॅकेज सुद्धा जाहीर केलं त्याचं धर्तीवर मृताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत दिली पाहिजे ही ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे
राज्य सरकारने संवेदना असल्यासारखे वागावे अशी आमची भूमिका आहे.असे मत दिपक केदार यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात सुद्धा होर्डिंग्ज पडून पाच जण मेली हे दुदैवी पण त्यांना मदत करून मानवता जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. पुणे होर्डिंग्ज प्रकरण असो की विरार शॉक प्रकरण असो त्यांना तात्काळ मदत जाहीर करून त्यांचा इलाज चांगला करावा ही आमची मागणी आहे!