अहमदनगर मध्ये मनुवाद्याची गडबड खपवून घेणार नाही; दिपक केदार यांचा इशारा!

अहमदनगर : संविधानवाद्यांचा बालेकिल्ला तिथे कुणी “छटाक मनुवादी” धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा “चेंडु” करायला वेळ लागणार नाही! असा शब्दात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी इशारा दिला आहे.
काही दिवसांपासून मनुवादी हे अहमदनगर येते धार्मिक खदखद तयार करत आहेत. कधी कालीचरण, कधी टी राजा, कधी नितेश राणे असे कर्मठ भडकाऊ भाषण करणारे, भाषणातून मुस्लिम समाजाच्या धर्माचा उल्लेख करून टार्गेट केले जात आहे. खोटे लव्ह जिहाद प्रकरणाचा कांगावा असो की पोलिसांना टार्गेट करणे असो नाही तर मुस्लिमांना रडारवर घेणे असो ते खुलेआम भडकाऊ बोलून निघून जातात आणि वातावरण दूषित होत असल्याची चर्चा अहमदनगर वाशियामध्ये सुरू झालेली आहे. स्थानिक सगळेच चांगले जगत आहेत, त्यांच्यात सामाजिक बांधिलकी आहे, सलोखा आहे हे बाहेरून आलेले पार्सल तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि गृहविभाग बघ्याची भूमिका घेत आहेत.
ऑल इंडिया पँथर सेना अनेक दिवसापासून बघत आहे. अहमदनगर ला मनुवादी रडारवर घेईला लागलेत. कधी पोलिसांना, कधी मुस्लिमांना टार्गेट करून पळून जायला लागलेत.
कोणत्याही परिस्थितीत ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्र पेटवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना खपवून घेणार नाही.