नाना पाटेकर ला नाही तर शेतकऱ्यांना मिट्टीची गरज – दिपक केदार

मुंबई : मुख्यमंत्री मोठा लांब लचक ताफा घेऊन प्रश्न मिटलेल्या अभिनेत्याच्या घरी गेले. नाना पाटेकर यांना जबरदस्त मिट्टी मारली. त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.
यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी जहरी टीका केली आहे. नाना पाटेकर प्रश्न मिटलेला अभिनेता आहे. मुख्यमंत्र्यांच्या मिट्टी ची गरज शेतकऱ्यांना आहे. ओला दुष्काळ पडला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे. एकमेकांचे गणपती बघून झाले असतील तर शेतकऱ्यांच्या घरात, दारात, बांधावर जा त्यांना आधाराची गरज आहे. संवेदनशील मंत्रिमंडळ सहली स्वभावाचे दिसत आहे. त्यांना कधी नैसर्गिक सहली तर कधी धार्मिक सहली ची आवड दिसत आहे. त्यांनी त्यांच्या सहली स्वभावाला आवर घालावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना वाचवावे, दलित अत्याचार थांबवावेत, आदिवासी अत्याचार थांबवावेत रोजगार देण्यावर भर द्यावा. संवेदनशील अभिनेता असलेले नाना पाटेकर यांनी आपल्या या मित्रांना सल्ला द्यावा आणि शेतकऱ्यांच्या घरी त्यांना पाठवावे असे आवाहन ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.