पळसखेडा पिंपळे बौध्द तरुणाची अतिशय निर्घृण हत्या!

जालना : भोकरदन, पळसखेडा पिंपळे येथील मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. अनुसूचित जाती बौध्द रत्नदीप भांबळे गावातील शाळेवर शिक्षक होता, हुशार होता त्यातूनच जातीवाद्याने त्याचा खून केला असल्याचे कुटुंब सांगत आहे. 31 जानेवारीला रत्नदीप शेतात गेला, घरी आला नाही म्हणून त्याचा भाऊ अमर भांबळे नी त्याला संपर्क केला पण फोन स्विचऑफ आल्यामुळे त्याची शोधा शोध सुरू केला. शेतात आंब्याच्या झाडाखाली रक्त सांडलेले दिसले, फडफडत नेतानाचे वर्ण दिसले, चपल पडलेली दिसली, फडफडत नेण्याची दिशा विहिरीकडे होती म्हणून विहिरीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या डोक्यात जबर हल्ला केला असून खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अज्ञातवर 302 खुनाचा गून्हा नोंद केला आहे. आज आठ दिवस झाले तरी आरोपी अटक केला जातं नाही. पोलीस यंत्रणा तपास करत नाही, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आहे.
गृहमंत्री यांनी दखल घेतलेली नाही. थेट खून केले जातात कायद्याची भीती राहत नाही, आरोपी अटक होत नाही हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? जालन्याच्या कोणत्या सत्ताधारी पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस आहेत. तपास लागत नसेल आरोपी अटक होत नसतील तर राज्यसरकारने सीआयडी मार्फत चौकशी करावी आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
या सत्तेत दलितांचे हत्याकांड सुरू आहेत याची दखल कुणीही घेत नाही, सरकार मूग गिळून गप्प बसली आहे. कुणालाही आमचा आक्रोश दिसत नाही. सगळे सत्तेच्या बाजारात रमले आहेत. संसदेत, विधानसभेत आमचे हत्याकांड चर्चेला घेतले जात नाहीत यापेक्षा दुर्दैव नाही.
आरोपीला अटक झालीच पाहिजे, रत्नदीप भांबळे ला न्याय मिळालाच पाहिजे, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना