Uncategorized

दलित समूह येते वाळीत टाकल्यासारखा जगतोय – दिपक केदार

चिंचवड संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे!

दलित समूह येते वाळीत टाकल्यासारखा जगतोय – दिपक केदार
“आम्ही चौघे भाऊ, मिळून मिसळून खाऊ” अशी अवस्था महाराष्ट्राची झालेली आहे. आज निवडून येणारे उद्या भाजपमध्ये जाणार नाही याची काय ग्यारंटी…
अनुसूचित जाती-जमाती घटक एकवठला आहे, विजय बॅट चाच होणार. दलितांचा पाठींबा चालतो पण त्यांना संधी कुणी देणार नाही. विधानसभा गठीत झाल्यापासून एकदाही येते बौद्ध, आदिवासी उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. एवढंच नाही पाठींबा घेईला फिल्डिंग लावतात पण आंबेडकरी पक्षाची उमेदवारी घेऊन लढायला लाज वाटते हि आमच्याबद्दल तुच्छतेची भावना आहे.
या मतदारसंघात झोपडपट्टीत राहणारा दलित समूह वाळीत टाकल्यासारखं जगत आहे, हे भयानक चीड आणणारं आहे. सर्वच पक्षांना आम्ही विचारतोय स्मार्ट सिटीसाठी आलेल्या ५२० करोड रुपयातील एक रुपया तरी झोपडपट्टी स्मार्ट करण्यासाठी लावला का? आजहि जातीयतेचा आलेखाने विकास केला जातो. जे आमदार होते जे आज नगरसेवक असताना आमदारकी लढत आहेत त्यांनी त्यांच्या वॉर्डात झोपडपट्टीचा विकास करून दलितांना मुख्य प्रवाहात का आणले नाही. जातीयवाद्यांना निळा रुमाल गळ्यात घालून, गाडीला लावून फिरण्याचा नैतिक अधिकार आहे का?
आमचा पाठींबा चालतो, राबायला कार्यकर्ता लागतो, पॉम्पलेट वाटायला माणसं आमचे लागतात, आमचा विकास करण्याची याना एलर्जी आहे.
सभा बघतोय सर्व नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत पण जनतेच्या प्रश्नावर भाषण करत नाहीत. त्यांनाही आता तेच तेच खोट बोलण्याची लाज वाटायला लागली आहे. प्राधिकरण हद्दीतील सातबारा देण्याची ग्वाही देणारे भाषण आजही यूट्यूब वर आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन नावाखाली एसआरए आणली ती योजना माणसाना जाणवारांसारखं कोंडणारा खोंडावडा आहे. ३०० स्क्वे.फूट. लोकप्रतिनिधींचे बाथरूम आहेत. एव्हड्या जागेत एक कुटूंब कसे राहणार? हि प्रक्रिया जनावरं सारखं जगणं देणारी प्रक्रिया आहे. बिल्डर राजकारणी शोषित घटकांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत.
रोजगाराच्या शोधात आलेल्या स्थलांतरितांना कुत्र्या-मांजरासारखी वागणूक दिली जाते. दबाव, भीती, शोषण हेच त्याच्या वाट्याला आलं. आर्थिक शोषण कंत्राट वर्ग करतो जो याच राजकारण्यांचा पाळीव असतो. त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसे लुटण्याचे काम महागडे भाडे घेऊन केला जातो. गरिबाना घर नाही कुठे गेली
पीएम आवास योजना सर्वाना घर योजना? आमच्यासाठी हा शोषित घटकांना स्वतंत्र भारतात मुक्तपणे हक्क अधिकाराने जगता यावं म्हणून आमचं हे राजकीय पाऊल आहे.
देशातील आशिया खण्डातील सर्वात मोठी बजेट असलेल्या महानगरपालिका यादीतील पिंपरी चिंचवड येते आज सोसायटीने गेटला पाणी नाही मत नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकलाय? हि घटना देशाला हादरवणारी आहे त्याच या राज्यकर्त्यांना विरोधकांना सोयरसुतक नाही, एवढे हे असंवेदनशील राजकीय खेळाडू झालेत.
आजवर केवळ गप्पा, भ्रष्टाचार, बागुलबुवा, फुगवलेला फुगा यापलीकडे काहीही झालेलं नाही. जात आणि पैसे या बळावर आम्ही काहीही करू हा न्यूनगंड येतील नेत्यांना झाला आहे. मतदार क्रांती करेल तेव्हा हे खडबडून जागे होतील.
सफाई कामगार ९९% हा दलित गरीब आहे. कोरोना काळात तो नसता तर पिंपरी चिंचवड सोडा संपूर्ण राज्याचे अस्तित्व धोक्यात आले असते. त्या सफाई कामगारांना घर नाही. तो यांच्यासाठी वॅरियर्स नाही का तर तो स्थलांतरित दलित असतो म्हणून…
पिंपरी चिंचवड मध्ये विकासाचा दृष्टिकोन जातीय झालाय म्हणून या भागातील दलित-मुल्सिम घटक नाकारला गेलाय.
ऑल इंडिया पॅन्थर सेना शोषित घटक, बेरोजगार, मजूर, राज्यभरात होत असलेले अन्याय अत्याचार, महिला सुरक्षा, दोन्ही व्यवस्थेकडून धोक्यात आलेले संविधान वाचण्यासाठी सर्व घटकांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी, आंबेडकरवादी राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी हा लढा आहे. आम्ही प्रचारानिमित्त झोपडपट्टी भागात गेलो त्यांच्या वेदना समजून घेतल्या. राज्यकर्त्यांच्या जातीयतेचे आम्ही बळी गेलेलो आहोत. विकास त्या भागातून फरार झाला आहे तो फरार करणारे जातीय मानसिकतेचे आहेत. त्यांना एक्सपोस करून अस्तित्व निर्माण केल्यास येते विजय आमचा आहे.
निवडणूक आयोगाने चोक भूमिका बजावल्यास पैसा वाटप थांबवल्यास विजय आमचा होईल. येते लढणारे “लोकनेते” नाही तर “पैसानेते” आहेत, त्यांनी पैसा बाजूला करून मैदानात उतरावे आमच्यापुढे ते टिकू शकत नाहीत.
आडणीचे मानसपुत्र म्हणून काही मंडळी फिरत आहेत, ज्यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर गौतम अडाणी उदोजकाची पाठराखण केली, असा युवा नेत्यांना खरंच गरिबांच्या प्रश्नांची जाण असेल का हा प्रश्न पडलाय?
शब्दांचे राजकारण केले जाते, पाठींबा मात्र भांडवलदार प्रस्थापितांना दिला जातो. आमच्या उमेदवाराला चळवळीचा समाजाचा उमेदवार म्हणून पाठींबा दिला नाही, याची चर्चा समाजात नक्की होणार. भाजपची व्यवस्था घालवण्यासाठी केवळ आंबेडकरवादी लढतो बाकी सगळे नाटक आहेत. आज लढणारे उमेदवार उद्या भाजपमध्ये जाणार नाहीत याची ग्वाही कुणी देईल का? भाजपला हरवायचं म्हणणारेच गुवाहाटीला जाऊ नयेत म्हणजे झालं. “आम्ही चौघे भाऊ मिळून मिसळून खाऊ” हि स्तिथी महाराष्ट्राने ओळखावि तरच परिवर्तन होईल.
बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, आरोग्य, पाणी प्रश्न, दलितांचे प्रश्न, महापुरुषांचा अवमान असे अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हि राजकीय भूमिका आहे. किशोर आत्माराम काशीकर हा आंदोलक अपक्ष उमेदवार ज्यांची निशाणी बॅट आहे ती गरीब, शोषित घटकांच्या मतावर विजयी होणार.
प्रश्नांना उत्तर देताना केदार यांनी सांगितले की तिरंगी चौरंगी नाही तर दोन रंगी लढत आहे, दुसरा नंबर आमचा आहे. विजय खेचून आणू.
२३ फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी काळेवाडी भागात जाहीर प्रचारसभा होणार आहे.
यावेळी उमेदवार काशीकर यांनी सांगितले की, आंदोलक कार्यकर्ताच समाजाचे, जनतेचे प्रश्न समजू शकतो त्यामुळे मलाच लोक मतदान करतील
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी उमेदवार किशोर आत्माराम काशीकर उपस्तीथ होते.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!