महाराष्ट्र

फिलोशिप द्या, मागासवर्गीय विद्यार्थी 45 दिवसापासून आझाद मैदानात!

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत 861विद्यार्थ्यांना संशोधन फिलोशीप साठी पात्र केले आहे. राज्य सरकार सामाजिक न्याय विभाग बजेटच्या नावाखाली या विद्यार्थ्यांना फिलोशिप देत नाही. या आधी त्यांनी पुणे येते आंदोलन केले, 45 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी या मुद्द्याला सोशल मीडिया माध्यमातुन राज्यव्यापी स्वरूप दिले आणि राज्यात एकच चर्चा झाली. अनेक पुढाऱ्यांनी या पोस्ट नंतर दखल घेऊन भेटी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी तर मला काही माहित नाही म्हणत निघून गेले असे पीडित विद्यार्थी सांगत आहेत.

ऑल इंडिया पँथर सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष संदेश वाघचौरे, पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज खाडे, मीनाक्षी बोर्डे महारष्ट्र संघटक यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे सुध्दा भेट देऊन गेले त्यांनी जोरात भाषण केलं टाळ्याही मिळवल्या पण त्यांच्या काळात सामाजिक अन्यायच झाला ही वस्तुस्थिती आहे.

दिपक केदार यांच्या भूमिकेने खळबळ उडाली आहे. गोसेवा आयोग काढून गाईसाठी 164 कोटींची बजेट मध्ये तरतूद होते आणि विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पैसे नाहीत. माणसापेक्षा जनावरं किंमतवान झाले आहेत. हक्क अधिकार न देणे हा मनुवाद आहे हे सरकार मनुवादी भूमिकेतून सुनियोजित रित्या शैक्षणिक घातपात करत आहे. आणखी रोहित वेमुला करू नका आणि आमचे तरुण मारू नका असे आव्हान सुद्धा त्यांनी केले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!