Uncategorized

अण्णा कुठंयत तुम्ही? – दिपक केदार यांचे हजारेंना आवाहन

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचे अण्णा हजारेंना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आवाहन!

राळेगणसिध्दी ते दिल्ली ही ओळख तुम्हाला ज्या जंतर मंतरने दिली. जवळपास 10 वर्ष झालं तुम्ही तिकडे गेलेच नाहीत.
देशाचा गौरव करणाऱ्या महिला पहिलवान आंदोलनाला बसल्यात याची कल्पना आहे की नाही? मोदी सरकार मधील ब्रिजभूषण नामक खासदाराने त्यांचे शोषण केलेले आहे याची कल्पना आहे की नाही?

काल आण्णा त्या महिला पहिलवान आंदोलकांना जनावरांसारखे पोलिसांनी गाड्यात कोंबले, खाली पाडले, त्यांचा आवाज दाबला, निशस्त्र आंदोलकांना शस्त्र हातात घेऊन, दंगलपथक वेगवेगळे बल वापरून त्यांचा आवाज दाबला.
जंतर मंतर वर त्यांचा आक्रोश सुरू आहे, त्यांच्या व्यथा मांडता मांडता आता त्यांचे अश्रू सुद्धा सुकून गेले आहेत, जंतरमंतर सुद्धा गहिवरलेल्या आवस्थेत आहे.

जंतर मंतरचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. देशात हळहळ व्यक्त होत आहे, ब्रिजभुषण नावाचा खासदार गुन्हा दाखल होऊन नव्या संसदेचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असतो आणि भारताच्या बेटीचे शोषण झालेले असताना पीडित म्हणून त्यांना न्याय दिला पाहिजे याउलट त्यांचा आवाज दाबला जातो.

अण्णा तुम्ही काहीच वाचत नाहीत का? अण्णा एक आंदोलक म्हणून तुम्हाला वाटत नाही का पुन्हा चलो जंतर मंतरचा नारा दिला पाहिजे? अण्णा तेंव्हा जनलोकपाल नावाने लढलात, तुमच्या लढ्यामुळे युपीए उद्धवस्त झाली. तुम्ही भाजपच्या राज्यात आंदोलनाचे अस्त्र का गुंडाळले? आंदोलकांना पक्ष असतो का? मग भाजपसाठी सॉफ्ट कॉर्नर का?

कालचे शोषणकारी फोटो पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात जाणार आहे की नाही? भारताच्या या रडणाऱ्या, न्याय मागणाऱ्या बेटीची तुम्हाला दया येणार आहे की नाही? बेटी बचाव, बेटी मिटाव सुरू आहे, बेटी वाचली पाहिजे असं आपल्याला वाटतं की नाही? अण्णा हे शांती कशासाठी? एक आंदोलक शांत कशा काय होऊ शकतो ते ही तब्बल 10 वर्ष?

भाजप विरोधात तुमचे न लढणे हे कशाचे संकेत आहेत? तुम्हाला देशाच्या महिलांचा आक्रोश दिसत नसेल तर अण्णा हे दुर्दैव आहे. एवढं घडतय त्या जंतर मंतरवर ज्या जंतर मंतर ने देशाला सांगितलं अण्णा हजारे कोण आहे.

पेटून उठावं लागेल अण्णा… आम्ही समजू शकतो, आता तुम्हाला तुमची ती फौज पुन्हा मिळणार नाही? तुमचे सहकारी रामदेवराव पतंजलीच्या बॉटली मध्ये गाईचा मुत ओतून विकण्यात मग्न आहे ते त्यांच्या अजेंड्यावर आजही कायम आहेत, स्वदेश हा त्यांचा नारा ते तंतोतंत गाईचा मुत विकून पाळत आहेत. तेंव्हा ड्रेस बदलून पळालेले रामदेवराव पुन्हा जंतर मंतर ला फिरकले नाहीत.

बेटी उचलून फेकली जाते, ती न्याय न्याय म्हणत आक्रोश करते तुम्ही तरीही शांत आहेत? दोन वर्ष आंदोलन सुरू होतं हजारो शेतकरी मेले तेव्हाही तुम्ही शांत? अनेक आंदोलने झाली, दंगली झाल्या, लोकशाही काल बुडून मारली तरी तुम्ही शांत? एवढी शांती कशासाठी अण्णा?

भाजपधार्जिणे असे खाजगीत लोक बोलत असतात, तुमचं ते आंदोलन सत्ता घालवण्यासाठी होतं असंही बोललं जातं. महाराष्ट्र शूरवीरांच्या शौर्याने गाजलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळे देश एकसंध आहे. आपल्यावर धार्जिणे लांचन योग्य नाही.

शेवटचं एक युद्ध होऊन जाऊ द्या अण्णा…
जिजाऊंच्या लेकीच्या न्यायासाठी ही व्यवस्था गुंडाळून टाका अण्णा…
जंतर मंतर गाठावं लागतंय पुन्हा एकदा पेटून उठावं लागतंय.

संविधान जिंदाबाद!
आंदोलन जिंदाबाद!!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!