शिवसेना – वंचित युतीवर शिक्कामोर्तब; खुद्द बाळासाहेब आंबेडकरांनी केले जाहीर!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी नोटबंदी सुप्रीम कोर्ट निर्णय संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर केले की, शिवसेना आणि आमची बोलणी संपली असून आमचे शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच आम्ही जाहीर करू, आम्हाला राष्ट्रवादी चा थेट विरोध आहे तर काँग्रेस चा चुपा विरोध असल्याचे ही मत त्यांनी व्यक्त केले.
आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या 81 जागा लढणार होतो पण आता शिवसेना सोडेल तेवढ्या जागा आम्ही लढू असेही त्यांनी जाहीर केले. यामुळे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचे संकेत मिळाले आहेत. यावर आज संजय राऊत यांनी सुद्धा युती बद्दल सकारात्मक भुमिका दाखवली.
काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना तीन तीघाडी टिकली तर या युतीत बिघाडी नाकारता येत नाही. नाही टिकली तर वंचित शिवसेना आघाडी जोरात असेल अशी चर्चा ट्विटर सोशल मिडियात सुरू आहे.