चळवळ

फेसबुक Followers गोठले; दिपक केदार यांची बोलकी प्रतिक्रिया!

फेसबुक : एका रात्रीत माझे 72000 हजाराहून थेट 9935 Followers झालेत किती हा महाघोटाळा? भारतात ईव्हीएम घोटाळा जगजाहीर आहे. चळवळीचा आधुनिक आवाज दाबण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसते. फेसबुक असे अर्ध्या रात्री डोक्यात दगड घालेल असे वाटले नव्हते. जगाचा एकच नियम झाला आहे आता दिवसा काहीही होत नाही. जे रात्री घडते त्याचा घडविता आता लपून राहिलेला नाही. “रात्रीस खेळ चाले” सारखी अवस्था झालेली आहे.
फेसबुक Followers असो की महाराष्ट्राचे आमदार असे रात्रीच साथ सोडतात. नोट बंदी असो की वेश बदलून एकमेकांना भेटणे असो रात्रीच सुरू असतं.
निषेध तरी करायचा कुणाचा? फेसबुक मालकच म्हणतो माझेच Followers रात्रीत कमी झालेत. टेक्निकल इश्यू असेल तर तो दुरुस्त करावा हे शस्त्र आमच्या चळवळीचे प्रमुख केंद्र झालेले आहे.
गोठ्ण्याचा हा अवकाळी काळ म्हणावा. थंडी आणखी लांब आहे गोठण्याचे तसे वातावरण नाही पण येते कृत्रिम ऋतूने थैमान घातले आहे. “खोके ओके” धोरण आल्यापासून ऋतू कधीही बदलतो, पाच वर्ष निवडणूका लोक आता विसरले आहेत. कधीही कुणाचे काहीही गोठू शकते असे कृत्रिम दिल्लीच्या दिशेने आलेल्या थंड वाऱ्यामुळे झाले आहे. तिकडे चिन्ह गोठले इकडे आमचे Followers गोठले.
इलाज तरी काय? फेसबुकने केलेला अन्याय फेसबुक वरच मांडावा लागतोय.

अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी फेसबुक पोस्त्वरून केली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!