अग्रलेख

“भाजपच्या मुस्लिम द्वेषाची उजळणी”

― स्वतः धर्मांधतेच्या उकिरड्यावर लोळायच, आणि तोच उकिरडा देशावर उधळण्याचा भिकारपणा करेपर्यंत भाजपची आज मजल गेली आहे.

―भाजपचा दक्षिण दिल्ली मधील खासदार “रमेश बिधुडी’ BSP च्या दानिश अली या मुसलमान खासदाराना – भडवे, कटवे, मुल्ले, आतंकवादी – वैगरे बोलला ते भाजपसाठी काही नवीन नाही. भटाळून गेलेले भाजपचे अंधभक्त मोदीभक्त रोज हिंदू धर्माच्या पवित्र नावाखाली – मुसलमानाना अशाच घाण घाण गलिच्छ शिव्या देत असतात. त्यांचा सोशल मीडियावर एकही दिवस हे शब्द उच्चारल्याशिवाय जात नाही. विशेष म्हणजे जे हिंदू आहेत ते जर सर्वधर्मसमभावाची गोष्ट करत असतील त्यानाही हे घृणास्पद विशेषण लावली जातात. ( तुम्ही माझ्या बऱ्याच पोस्ट खालील कमेंट वाचू शकता तिथेही यातील एकतरी शब्द सापडणार, )

― ह्या टोकार वृत्तीचा परधर्मद्वेष व परधर्म तिरस्कारातून आलेल्या शिव्या देऊनही ते निर्लज्ज निसुर होऊन काहीच वाईट केले नाही, उलट जणू काय कुठलं पुण्य केलंय, या अविर्भावात बागडतात. त्याना जराही कल्पना नसते की या द्वेषाने आपली बुद्धी अक्षरशः नासुन गेलीय. मुळात ते या शिव्या देतात. त्याना व्यक्तिगत जीवनात कोणत्याही मुसलमानाने नुकसान पोहचवलेलं नसत. का शिव्या देता तर ते सटरफटर कारण देतात.! जसे की लव्ह जिहाद वैगरे. लव्ह जिहाद साठी हिंदू संघटनांनी अनेक मोर्चे काढले आहेत हे मोर्चे भाजप पुरस्कृत आहेत. त्यातले लोक हे भाजपचे कट्टर भक्त आहेत. मोर्चात सुद्धा मुसलमानाचा व्देष करणाऱ्या घोषणा दिल्या जातात. जेणेकरून या घोषणा नॉर्मल होतील. सामान्य राजकारणापासून अलिप्त असलेल्या हिंदू माणसाला अशा विखारी घोषणा देण्यात अवघडलेलं वाटू नये. त्याच्या मनातील धर्मनिरपेक्षता हे तत्व हळूहळू संपुष्टात आणण्यासाठीच्या ह्या सर्व घोषणा असतात.

― पण याना जेव्हा आम्ही सांगतो की तुमच्या विचाराच असलेले तथाकथित हिंदूत्ववादी सरकारचे मंत्री संसदेत लव्ह जिहादच्या केसेस नाही असा रिपोर्ट देतात. तुमचं सरकार सुद्धा अधिकृतरित्या मान्य करत की लव्ह जिहाद घडलं नाही. हे सप्रमाण उदाहरण देऊनही ते ऐकत नाही. केवळ निर्बुद्धपणे भावनिकतेच्या मुद्द्यावर वेळ मारून नेतात. (शेवटी भक्तच ते )

― हे सर्व अतिशय पूर्वनियोजनबद्ध पद्धतीने चालू होत व आताही चालू आहे.. कुणाला वाटेल हे 2014 पासून चालू झाल, तर ते अर्धवट सत्य आहे. याची खरी सुरवात लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रेपासून सुरू झाली आहे.

― देश जागतिकीकरणाच्या रंगी रंगून मोठी अर्थव्यवस्था बनण्याची तयारी करत असताना पराभवी वैफल्याने ग्रस्त असलेल्या भाजपने देशात सत्ता राम मंदिर- बाबरी मशिदीचा बहुसंख्य हिंदू विरुध्द अल्पसंख्याक मुस्लिम हा काही तर्क नसलेला झगडा देशाच्या माथी मारला. देश 21 व्या शतकात पदार्पण करून नव्या महासत्तेची स्वप्न पाहत असताना. देशाला सांस्कृतिक सामाजिक धार्मिक रित्या भ्रष्ट करून धर्मांधतेच्या खाईत लोटल. याला साथ त्यांच्या छोट्या मोठ्या समविचारी पक्षांनी दिली. मात्र कुरापती व भ्रष्ट डोकं हे संघप्रणित भाजपचचं.

~ इंडलॉजिस्ट शरद पाटील त्यांच्या धर्मनिरपेक्षता ब्राह्मणी -अब्राह्मणी या लेखात सांगतात ―

…रामाच्या नावे धार्मिक दंगे भडकवून ब्राह्मणी शक्ती दोन उद्दिष्टे एकसमयावच्छेदेकरून साद्य करतात – सर्व हिंदूची मुसलमानाविरोधी – त्यांना आधुनिक राक्षस भासवून, किंबहुना ज्यु – जातपंथलिंगवर्गातीत एकजूट करणे आणि मग ब्राह्मणी धर्माच्या पगड्याचा उपयोग दलित, आदिवासी व ओबीसी यांना जखडणाऱ्या जातिव्यवस्थेच्या बेड्या मजबूत करणे. याची रंगीत तालीम लालकृष्ण अडवाणीनीं रामरथ काढून सिंग सरकार पाडले व त्याबरोबर मंडल आयोगाची आंशिक अंमलबजावणीही रोखली तेव्हा झाली…

देशात हिंदू मुस्लीम दंगली पेटवण्यामागे हे कारण शरद पाटील यांनी त्याकाळीच दिलं होतं पण तेव्हाचे सत्ताधारी सत्तेच्या मस्तीत असल्याने. त्याना आम्ही आता सूर्यचंद्र असेपर्यंत सत्तेत असणार. भाजपला किरकोळ समजले, याने भाजपची लढाई सोपी व साध्य झाली. ते हळूहळू विविध दुसऱ्या फळीतील संघटना घेऊन मंदविषाप्रमाणे देशात धर्मांधतेच विष पसरवत आहेत तेही हिंदूधर्म, लोकांचं श्रध्दास्थान असलेल्या रामाच्या नावाने. कारण त्याना ठाऊक आहे आपला मुस्लिम द्वेष खपवायला आपल्याकडे पवित्र चेहराच नाही. म्हणून आपल्या मुस्लिमद्वेषाचा सडका माल हिंदूंना पूज्यपवित्र असलेल्या रामाच्या नावाने खपवतात व त्याने त्यांचं उद्दिष्ट साध्य होत

―हिंदूंची एकजूट करून त्याना मुस्लिम शत्रू भासवून ते एकप्रकारे हळूच मनुशाही उर्फ भटाळशाही आणू पाहतात. यात भरडला जाणार तो सर्वात जास्त सामान्य बहुजन हिंदू

आज भाजप खासदार लोकशाही संसदेत अशा घोषणा देतोय. उद्या भक्त सुद्धा देतील. हा द्वेष नॉर्मल करण्याचा पायंडा आहे याला रोखण्याची जबाबदारी आपली

― विजय गिते

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!