दिपक केदार यांच्या एका भूमिकेने राजकीय दुकानदारी बंद!

भाजपाला रोखण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. सर्व स्तरावर आंबेडकरी विचारांच्या ज्येष्ठ विचारवंत, नेत्यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे.
केंद्रातील सत्ता दलितांचा आतोनात छळ करते, गेली अनेक वर्ष दिपक केदार या व्यवस्थेला टार्गेट करत आहे. जेंव्हा आंबेडकरी चळवळीला भाजपा च्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा दिपक केदार यांनी संघाच्या डीएनए मध्ये मनुवाद आहे हे एक्सपोज करून ती भूमिका थांबवली.
आता थेट भाजपा हटाव साठी घेतलेली भूमिका एक क्रांती आहे. या भूमिकेनंतर अनेकांनी वास्तव अंगिकारून मैदानात उतरायला सुरवात केली आहे. येणाऱ्या दोन दिवसात सगळे चित्र स्पष्ट झालेले असेल.
हि शेवटची निवडणूक आहे, आपल्याला स्वार्थ न ठेवता लढावं लागेल म्हणत थेट उघड उघड महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन त्यांचं घटक होत या हुकुमशाही ला घालवण्याचा लढ्यात सहभागी झाले.
एकमात्र खरं आहे, दिपक केदार यांच्या भूमिकेमुळे तडजोडी आणि विकाऊ राजकारण संपले आहे.