चळवळ

संविधान वाचविणे हाच महाविकास आघाडी सोबत जाण्याचा उद्देश!

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेली, गद्दार झाले अशा आशयाच्या पोस्ट वायरल करणारे आरएसएस हस्तक आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेच्या निर्णायक भूमिकेचे स्वागत बहुजन समाजाने केले आहे.

जी आज व्यवस्था अस्तित्वात आहे तिच्यामुळे दलितांचे समग्र अस्तित्व धोक्यात आले आहे. तिला घालण्याचे हे आंदोलन आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कदापि आंबेडकरी चळवळीला वेगळ्या दिशेने नेणारे नाहीत जाणीव काही जणांना नसणे हे मोठी शोकांतिका आहे.

पत्रकार परिषदेत दिपक केदार यांनी जे मुद्दे मांडले ते आजवर कुणीच मांडलेले नाहीत. त्यांच्या प्रेस वरुन त्यांची या व्यवस्थेविरोधात जी चीड दिसली तीच पँथर भूमिका आहे. संविधान वाचविणे, दलितांचे रक्षण करणे, भूमिहीनांना जमिनीचा हक्क मिळावा, विद्यार्थ्यांना फिलोशिप मिळावी असे अनेक मुद्दे सहा मिनिटात मांडणारा हा नेता आज आरएसएस हस्तक बदनाम करत आहे.

दिपक केदार यांच्या भूमिकेमुळे भाजपाला घरी बसावं लागणार यात आता शंका राहिलेली नाही. ऑल इंडिया पँथर सेना महाविकास आघाडी, इंडिया आघाडीची घटक झालेली आहे. देश वाचविण्याच्या लढ्यात निस्वार्थ उतरलेली आहे.

  • अमोल सदाशिवे, महाराष्ट्र प्रवक्ता

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!