संविधान वाचविणे हाच महाविकास आघाडी सोबत जाण्याचा उद्देश!

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेली, गद्दार झाले अशा आशयाच्या पोस्ट वायरल करणारे आरएसएस हस्तक आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेच्या निर्णायक भूमिकेचे स्वागत बहुजन समाजाने केले आहे.
जी आज व्यवस्था अस्तित्वात आहे तिच्यामुळे दलितांचे समग्र अस्तित्व धोक्यात आले आहे. तिला घालण्याचे हे आंदोलन आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कदापि आंबेडकरी चळवळीला वेगळ्या दिशेने नेणारे नाहीत जाणीव काही जणांना नसणे हे मोठी शोकांतिका आहे.
पत्रकार परिषदेत दिपक केदार यांनी जे मुद्दे मांडले ते आजवर कुणीच मांडलेले नाहीत. त्यांच्या प्रेस वरुन त्यांची या व्यवस्थेविरोधात जी चीड दिसली तीच पँथर भूमिका आहे. संविधान वाचविणे, दलितांचे रक्षण करणे, भूमिहीनांना जमिनीचा हक्क मिळावा, विद्यार्थ्यांना फिलोशिप मिळावी असे अनेक मुद्दे सहा मिनिटात मांडणारा हा नेता आज आरएसएस हस्तक बदनाम करत आहे.
दिपक केदार यांच्या भूमिकेमुळे भाजपाला घरी बसावं लागणार यात आता शंका राहिलेली नाही. ऑल इंडिया पँथर सेना महाविकास आघाडी, इंडिया आघाडीची घटक झालेली आहे. देश वाचविण्याच्या लढ्यात निस्वार्थ उतरलेली आहे.
- अमोल सदाशिवे, महाराष्ट्र प्रवक्ता