“ट्रोल गँग” वाले “झापडबंद-गुलाम” झालेत!

#पँथरनामा : आंबेडकरी चळवळ जिवंत, डोळस, नवमत निर्मितीची चळवळ आहे. दुर्दैवाने आरएसएस भाजपा चे काही मंडळीने मधल्या काळात या चळवळीत मोठ्या प्रमाणात शिरकाव केला. त्यात काही समाजवादी, कम्युनिस्ट, आरएसएस अशा भेसळयुक्त चळवळीची निर्मिती झाली.
आंबेडकरी चळवळीचे शत्रूच, आम्ही आंबेडकरी चळवळ असल्याचे भासवायला लागले. राजकीय शिक्षण नावाखाली जे केडर दिले, त्यात शत्रू ठरवण्यात आले. आंबेडकरी चळवळीत लढणारे नवे तरुण नेते असतील, उभरते कार्यकर्ते असतील. त्यांना टार्गेट करण्यासाठी ट्रोल गँग ची निर्मिती झाली, निर्मितीकार समाजवादी संघ विचाराचे होते, त्यामुळे त्यांनी या “ट्रोल गँग” मधे मोठ्या प्रमाणात कामगार, शिकणाऱ्या तरुणांची भरती केली. ट्रोल करणे हीच तुझी चळवळ असं बिंबवले. आता आपण बघत असाल सोशल मीडियात असे तरुण तुटून पडलेले दिसतात. भक्तीत तलीन असतात, आरएसएस ला पोषक काम करताना ते दिसत असतात. राज्यात दलित अत्याचार, शिष्यवृत्ती, घर, गायरान, दलित बेरोजगारी, भूमिहीन मजूर यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या नेतृत्वावर हे टीका करतात, तेंव्हा ते किती दृष्टिहीन, गुलाम, आंधळे झालेत हे समजेल.
आंबेडकरी चळवळीत घुसखोरी झालेली आहे हे आता उघड झाले आहे. झापडबंद गँग निर्माण करून आमच्या या भावनिक, तळमळी, चळवळीची मोठी हानी केली आहे. यातून तरुणांनी बाहेर पडले पाहिजे. निष्ठावंत नावाखाली आपण शत्रूचेच हस्तक होतोय याचं भान ठेवलं पाहिजे.
पँथर ही मूव्हमेंट जिने कधीही ट्रोल गँग तयार केली नाही. नीतिमत्ता, चळवळीशी बांधिलकी, नवनिर्मितीला तिने जन्माला घातले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव विचारधारा कवटाळून तो पुढे निघालेला आहे. या विचारधारेचा तो पुरस्कृता आहे म्हणून समाजवादी घुसखोर प्रवृत्तीच्या रडारवर आहे.
“ट्रोल” चळवळीमुळे झापडबंद तरुण निर्माण झाले, या ट्रोल चळवळीचा वापर आरएसएस विरोधात झाला पाहिजे पण तो होत नाही, उलट स्वकियांशी भिडवण्यात संघाचे हस्तक यशस्वी झाल्याचे चित्र आहे. म्हणून आता मंदिराचे स्वागत केले जात आहे, धार्मिक चळवळीला प्राधान्य दिले, हळूहळू हे भाजापा सारख्या पक्षासोबत जाण्याच्या दिशेला मदत करताना दिसत आहेत.
मनुवादी विरोधात लढणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याला रोखण्यासाठी ही किट काम करत असते. ज्याने या चळवळीचा नासाडा करायला सुरवात केली त्यांचे मनसुभे उधळून लावताना फक्त पँथर दिसत आहे. राज्यात फक्त पँथर एकमेव संघटन आहे जे आरएसएस विरोधात खंबीरपणे लढत आहे. झुकत नाही, असली मेंदूने अपंग असलेली मंदबुध्दी ट्रोल गँग निर्माण करत नाही. विचार स्वातंत्र्याला, व्यक्ती स्वातंत्र्याला आळा घालात नाही, त्याची डोळस वृत्ती हिसकावून घेत नाही.
वाईट वाटत गेल्या पाच वर्षात चळवळीचं या लोकांनी मातिरे करून टाकले. पँथर ने या आठ दिवसात भूमिका घेतली म्हणून त्या भूमिकांच्या पाठीमागे येण्यास सुरवात झाली हे नाकारले जाईल पण हे पँथर मुळेच झालं हे नाकारता सुद्धा येणार नाही. पँथर नसती तर चळवळीत घुसलेल्या समाजवादी, आरएसएस घुसखोरानी आता पर्यंत ही चळवळ आमची आहे हे जाहीर केले असते.
ट्रोल गँग मधून बाहेर पडा आणि आपलं मत मांडायला सुरवात करा, तुमच्या ट्रोल ग्रुप मध्ये रोज सकाळी कुणाला आज टार्गेट करायचे हा आलेला आदेश मोडीत काढा, अन्यथा येणारा काळ चळवळीला आरएसएसच्या दिशेने घेऊन जाणारा असेल, आपण तेव्हाही ती बाजू समजून सांगणारे झापडबंद गुलाम झालेले असाल आणि आंबेडकरी चळवळच्या समोर तुम्ही आंबेडकरी चळवळ वाहकच नकळत विरोधात उभे असाल.
- पँथरनामा