चळवळपॅन्थर ओळखमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

दलित पँथर च्या स्थापनेचा वाद घालणारे “पँथरद्रोही” आहेत – दिपक केदार

इतिहासातून काय घेईचे याच भान असल पाहिजे. दलित पँथर स्थापनेचे वाद असले तरी किंवा त्या काळातील नेत्यांचे मतभेद द्वेष असले तरी आज आम्ही त्यांच्यातला निर्भीड बाणा, लढाऊवृत्ती, वैचारिक अधिष्ठान हे घेऊन पुढे निघालेलो आहोत. जेंव्हा आम्ही ही पँथर चळवळ फोपावली तेंव्हा काही पँथरद्रोही मंडळीने आज उभा राहिलेली तरुणांची पँथर चळवळ उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले आणि त्यातूनच पँथर स्थापनेचा वाद 50 वर्षांनंतर उखरून काढला.
कुणी 29 मे म्हणतोय तर कुणी 09 जुलै म्हणतोय. या पँथरच्या स्थापना वादात आज आम्हाला रस नाही. इतिहासातून आम्ही लढण्याची प्रेरणा घेतोय फुटीचा द्वेषाचा इतिहास गाळून पुढे निघालो आहोत.
ज्यांचा आणि पँथरचा कसलाही संबंध नाही ते पुढे येऊन हा वाद निर्माण करतात जेणेकरून पँथर चळवळी बद्दल आजच्या पिढीत द्वेष निर्माण झाला पाहिजे आणि आम्ही निर्माण केलेली ही नवी चळवळ मोडीत काढली पाहिजे हाच यामागील अजेंडा आहे. येणारे हजारो वर्ष माणसाला माणूस म्हणून जगू देण्यासाठीचा लढा पँथर म्हणून आम्ही देणार आहोत. मानवतेसाठी, शोषितांसाठी जो जो लढतो तो तो पँथर असतो. एवढी सरळ व्याख्या घेऊन आम्ही निघालो आहोत.
आजही आमचे प्रश्न तसेच आहेत, आजही आमच्या धींडी निघतात, आजही आम्हाला पाणी नाकारले जाते, आजही आम्हाला स्वतंत्र मिळालेले नाही. त्यामुळे आजही आमचा संघर्ष संपलेला नाही. गायरान, घरकुल हेच आमचे प्रश्न 70 वर्ष झाल सुटलेले नाहीत. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गुलामगिरी नष्ट झालेली नाही. त्याविरोधात आम्ही पुन्हा एकदा तशीच चळवळ उभा केली आहे. आज केवळ आमच्या लढ्यामुळे सगळेच पँथर पँथर करायला लागले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
आम्ही आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी ज्या ज्या पँथरने संघर्ष केला त्या सगळ्यांचे स्मारक उभा केले पाहिजेत. दंगली करणारे महाभाग धर्मवीर झाले त्यांचे पिक्चर पुतळे उभा राहिले. दुसरीकडे आमच्या आया बहिणीच्या नग्न धिंड थांबवा आम्हाला माणूस म्हणून जगू द्या म्हणत दलित रक्षणासाठी भागवत जाधव जयभीम जयभीम म्हणत मेला त्याचं आपण काय केलं? ना पुतळा उभा केला ना त्यांचा इतिहास जपला. पोचिराम कांबळे, गौतम वाघमारे असे अनेक पँथर शहीद झाले त्यांचा इतिहास आपल्याला जपावा लागेल तेवत ठेवावा लागेल तरच ही पिढी अन्याया विरोधात पेटून उठेल.
आज जे सत्तेत बसलेत ते आमच्या भागवत जाधवच्या डोक्यात पाटा घालून बसलेत. शहीद भागवत जाधवला मारून शिवसेना उभा राहिली. आम्हाला रक्तबंबाळ करून तिने सत्तेची पोळी लाटली. आज शहीद भागवत क्या हत्याऱ्या पक्षासोबत आम्ही घरोबा करायला निघालोय यापेक्षा दुर्दैव नाही.
आमचा आक्रोश अफाट आहे, अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आम्ही ते सोशल मीडियातून व्हायरल केले. समाज माध्यमांनी कधीही दलितांची बातमी दाखवली नाही. येते मुंबईतील एका नेत्यांचं कुत्रं मरत तर त्याची ब्रेकींग न्यूज होते. झाडी, डोंगर, होटिल या व्हायरल ऑडियो क्लीपला शकेडो वेळा टिव्ही वर दाखवल पण कधीही आमच्यावरील अन्याय दाखवला नाही.
आज सर्व स्तंभ उध्वस्त अवस्थेत आहेत, मनुवादी कब्जा करून बसले आहेत. अशावेळी आपली लढाई आणखीन बिकट झालेली आहे. त्याकाळी लेख छापून तरी येईचे आज आमची बातमी सुद्धा येत नाही. आजची लढाई भयानक अवघड आहे. पण ती लढावी लागेल हाच आपण आज संकलप केला पाहिजे.
खासदारकी आमदारकी हा आपल्या आजच्या चळवळीचा अजेंडा झाला आहे. सेफ चळवळ हे धोरण झालं आहे. आपण सगळे सभागृही रमलो आहोत, रस्त्यावरील संघर्ष मागे पडला आहे. डरपोक नेतृत्व करू लागले आहेत. पँथर निडर होती डरपोक नव्हती, ती चॅलेंज करत होती घरोबा करत नव्हती.
आमच्या आंबेडकरवादी चळवळीला कायम कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांनी घेरलं, कलंक लाऊन चळवळीला उद्धवस्त केले हा माझा आरोप आहे. आजही “एक समाजवादी” आंबेडकरी चळवळ संपवत आहे. नामदेव ढसाळांवर कम्युनिस्ट असल्याचा आरोप लाऊन खेळ संपवला गेला. आज तर थेट मनुवादी पक्षात स्वतः ला आंबेडकरी म्हणणारे बसले आहेत. तरी सुद्धा कुणी बोलायला तयार नाही.
दलित पँथर बहुजनांची संघटना होती तिला एका जातीपुरत मर्यादित करण्यात आल. सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा हा बहुजनांना सोबत घेऊन लढला होता. आज जेव्हां आम्ही चर्मकार मातंग समुहासाठी लढतो तेंव्हा आपलेच गांडीला हात पोहोचलेले महाभाग दिशाभूल करतात. चर्मकार हिंदु आहे, मातंग आपले नाहीत असा ते अपप्रचार करत असतात. त्यांना आजच्या दिवशी मला सांगायचे आहे. ईतिहासात डोकाव लागेल, नायगाव वरळी तील पहिल्या मोर्च्यात पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात पहिला शहीद झाला रमेश देवरुखकर हा चर्मकार होता, जयभीम जयभीम म्हणत जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी शहीद झाला तो पोचीराम कांबळे मातंग होता. आदिवासी, दलित, मुस्लिमांची ही संघटना होती ज्यांनी आपल्या अस्तित्वासाठी मरण पत्करले त्या शहिदांच्या लढाईला आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. सामाजिक क्रांतीसाठी दलित पँथरच हे सुध्दा एक सोशल इंजिनियरिंगच होत.
फुटीचा इतिहास वाचून वाचून कंटाळा आला. ऐक्य आता शक्य नाही, असं दिसायला लागलय. दर निवडणुकीच्या तोंडावर या टिमक्या वाजत असतात. आंबेडकरी समूह पहिल्यांदा हे सगळ राजकारण समजला आहे. आजवर देवाणघेवाण लपून राहिल्या आता देवाणघेवाण पदाचे गणित याच्या खुलेआम चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्या चळवळी वरील विश्वास संपला.
आंबेडकरी समूहाला आता नव्या दमाच्या पँथर वर विश्वास बसत आहे. त्यांना त्यांच्या न्याय हककांसाठी लढणारी फौज पँथर मधे दिसत आहे. आणि म्हणूनच आज सगळे पुन्हा पँथर पँथर करू लागलेत. पँथर हा ढोंग करण्याचा, सोंग करण्याचा विषय नाही. पँथर सूर्यासारखा स्पष्ट दिसत असतो, त्याचं कार्य तेजोमय असत, सोंग आणि ढोंग येते जमत नाही.
विचारधारा आता संपुष्टात येत आहे. विचारधारेशी तडजोड सुरू झाली आहे. कुणी कुणासोबत ही चालला आहे. सत्तेत वाटा इतका महत्वाचा झालाय की त्यात आता विचारधारा राहिली नाही. त्यामुळे थेट फुले, शाहू, आंबेडकरी विचारलाच हा छेद आहे.
संविधान वाचवण्यासाठी सज्ज व्हा, आज कुणीही संविधान आधारित चालत नाहीत. सगळे हुकूमशाही बळावर चालत आहेत. कोर्ट, सत्ता, माध्यम सगळे पाडले जात आहेत. धार्मिक उद्रेक हा संविधान संपवण्यासाठी आहे. गुलामगिरी विरोधात आपल्याला नव्याने लढावे लागेल.
आम्ही पँथर जिवंत ठेवणार, ही स्वाभिमानाची ताठ मान पँथरची देण आहे. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार, शहीद भागवत जाधव, शहीद पोचिराम कांबळे, शहीद गौतम वाघमारे, शहीद जनर्धन मेवाडे, अरुण कांबळे शेकडो नेते, लाखो पँथर तुमच्या कार्याला जयभीम!

वालचंदनगर येथील दलित पँथर वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आपले मत व्यक्त केले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!