राजकीय
नव्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी हा देश पायगुनावर चालत नाही…

नव्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी हा देश पायगुनावर चालत नाही, हा देश संविधानावर चालतो. ओबीसींना आरक्षण संविधानामुळे मिळाले. पायगुनावर न्यायालय, कायदा चालत नाही. तुमच्याच पायगुनामुळे झालंय तर मग तुमची सत्ता आल्यावर आलेला महापूर आणि त्या पुरात गेलेले बळी ही काय तुमच्या पायगुनाची देण आहे का?
अंधश्रद्धा हेच का तुमचं हिंदुत्व? हे राज्य संत गाडगे महाराजांचे, महात्मा फुलेंचे, नरेंद्र दाभोलकर तर शहीद झाले. मुख्यमंत्री पायागुनाची भाषा करून संविधान नाकारतात हे दुर्दैव आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या विज्ञानवादी संविधानावर चालतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचा निषेध करतो.
दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
#allindiapanthersena