मातंग समाजाच्या 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार…

मानवतेला काळीमा फासणारी घटना धानोरा, उस्मानाबाद येते घडलेली आहे. दलित असलेल्या मातंग समाजाच्या चार वर्षीय चिमुडीवर गावातीलच नराधमाने बलात्कार केला. घटना एवढी गंभीर असताना गावातील जातीयवादी गावगुंडांनी हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आहे. गरीब, दलित असल्याचा फायदा घेतला गेला आहे. हे आमचं काय वाकड करणार ही मानसिकता आहे आणि त्यातूनच कायद्याचा धाक नसणे पोलिसांची भीती नसणे त्यामुळे नराधम बोकाळले आहेत.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून आरोपीला फाशी झालीच पाहिजे!
पीडित मुलीला पोलीस संरक्षण द्यावे!
आरोपीच्या पाठीशी उभा राहिलेल्या नराधम जातीयवादी गावगुंडांना सह- आरोपी करावे!
पिडित मुलीचे आरोग्य, शिक्षणासाठी 25 लाखांची मदत द्यावी!
महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ गृहमंत्री पद जाहीर झाले पाहिजे.
बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा लोप पावला आहे. बेटी मिटाव धोरण सुरू झालेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो. तात्काळ महिला आयोगाने, अनुसूचित जाती जमाती आयोगाने भूमिका घ्यावी आणि पिडीतांना भेट देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी.
अशी ऑल इंडिया पँथर सेनेची भूमिका आहे!
दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना