चळवळ

नाशिक नऊ वर्षाच्या बौध्द मुलीवर बलात्कार, 56 वर्षीय नराधमाने केला पाशवी अत्याचार

नाशिक : पुन्हा मन सुन्न झालं.. पुन्हा हादरून टाकणारी घटना…
अंबड, पोलीस स्टेशन हद्द, नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून टाकणारी, मानवतेला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नऊ वर्षाच्या बौध्द चिमुरडीवर 56 वर्षाच्या नरधमाने बलात्कार केला.
मुलीला गावातच आडबाजूला नेऊन या नराधमाने अत्याचार केला. 02 ऑगस्ट, 05 ऑगस्ट या दोन दिवशी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. जातीचा माज असलेला स्वतःला पाटील लावणारा हा नराधम आहे. नाशिक इंदिरानगर भागात पीडित कुटुंबाची चहाची टपरी आहे. आई मुलगा दोघे हे चहाचे दुकान चालवतात. अतिशय हलाखीची परिस्तिथी आहे. ताईच्या मुलीवर या हरामखोराचा डोळा होता. घराच्या थोड अंतरावर हा राहतो. त्याला हे कुटुंब पाटील बाबा म्हणायचं. मुलगी सुद्धा वडील आजोबांच्या नात्याने पाटील बाबा म्हणायचे. या पाटील बाबाने घात केला, पीडित कुटुंब हातावर पोट भरत आहे. मुलीचे वडील अचानक तीन वर्षांपूर्वी गायब झालेले आहेत. या सगळ्या हतबलतेचा फायदा त्या नराधमाने घेतला आहे.
मुलीला जेव्हा रात्री असाह्य वेदना झाला तेव्हा आईने विश्वासात घेऊन विचारले. मुलीने जे सांगितले ते मानवतेला काळीमा फासणारे आहे. पाटील बाबा ने मोठा घात केला, पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्हाला तुमची जात दाखऊन देतो म्हणून हिणवलं. त्यांच्या गरिबीचा आणि जातीचा फायदा या माजूर्ड्याने घेतला.
चहाची टपरी चालवून स्वाभिमानाने भीमाची वाघीण जगत आहे. अकरावीत असलेला मुलगा सुद्धा आईला मदत करतो. सर्व नातेवाईकांचा सल्ला घेऊन पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली. आरोपी अटक केला असून त्याच्यावर पोक्सो, 376, अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झाली आहे. न्यायालयाने 14 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिलेली आहे.
भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव किती जल्लोषात सुरू आहे. भारताची बेटी, दलित बेटी या देशात सुरक्षित नाही. दीक्षा ला विष पाजलेली घटना ताजी असतानाच ही घटना घडली. राज्य सरकार या संदर्भात काहीच बोलत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा दलित बेटींच्या घरी जात नाहीत.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून तात्काळ सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी जन्मठेप देण्यात यावी. पिडित कुटुंबाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. पिडित मुलीच्या शिक्षणाची व शासकीय नोकरीची जबाबदारी तात्काळ शासनाने घ्यावी. पिडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी. असे आव्हान फेसबुक पोस्टच्या माध्यमांतून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!