Uncategorized

सख्या चुलत्याने केली प्रा. संतोष आढाव यांची हत्या!

जालना : प्रा. संतोष आढाव वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव होते त्यांची काल निर्घृण हत्या झाली आणि राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

वास्तविक, प्रा. संतोष आढाव आणि त्यांचे चुलते यांचा जमिनीचा वाद सुरू होता. रामनगर कारखान्याच्या बाजूला गायरान जमीन शासनाने त्यांना दिलेली आहे. एकेकाळी खंडर कवडीमोल भाव असलेली पडीक जमीन आज तिला अफाट महत्व आले आहे. ही जमिनीतून समृध्दी महामार्ग जाणार आहे. त्यामुळे या जमिनीचे अफाट पैसे भेटणार आहेत. त्यामुळे वाद टोकाला गेला आणि त्यातून जीव घेण्या पर्यंत प्रकरण गेले.

आंबेडकरी विचारांचे काम करणारे आपण एव्हढे स्वार्थी कसं काय होऊ शकतो. माहिती घेतली तर हल्ला करणारा चुलता आंबेडकरी शाहीर आहे, आणि मृत्युमुखी पडलेले संतोष आढाव कार्यकर्ते आहेत.

प्रा. संतोष आढाव यांच्या जाण्याने जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते हळहळ व्यक्त करत आहेत. अशी घटना घडलीच कशी हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ते करत आहे.

रामनगर भागात कार्यकर्ता संपवला जातो त्या अनुषंगाने या प्रकरणाला दुसरी काही पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!