अग्रलेख

हुजगेगिरीच्या वाटेवर…

तडजोडीच्या राजकारणाने राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. कोण कधी कुठे जाईल अन् कोण कधी कुणाला मिट्टी मारेल सांगताच येत नाही. सर्वसामान्य स्वाभिमानी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, चिंता आहे, संभ्रम आहे. नेतृत्व म्हणून संभ्रम निर्माण करणे हेच नेतृत्व असतं हे हल्ली लोकांना उमजायला लागलं आहे. याआधी राजकारण झालं असेल पण त्यामागील स्टोरी कळत नसेल आज त्यामागची स्वार्थी भूमिका सुद्धा लोकांना कळायला लागली अन् राजकारण काय सेवा नाही तर स्वार्थ आहे हे उघडपणे लोक बोलू लागलेत. तडजोडीच्या राजकारणात आता सगळ्यांनी आघाडी घेतलेली आहे. आघाडीला हल्ली खूप महत्व प्राप्त झाले आहे. स्वबळ नावाचा स्व:अस्तित्व लढा संपलेला आहे. एकट्याची सत्ता याचं स्वन बघणे सुद्धा नेत्यांनी सोडून दिलेले आहे.

सत्तेला जे महत्व प्राप्त झालंय त्यामुळे विरोधक संपले असून कुणी आतून कुणी बाहेरून मित्र होऊन सत्ताधाऱ्यांची हुजगेगिरी करताना दिसतात. टोकाचा विरोध मावळला आहे, विरोधाला विरोध हा थोडा टाकलेला आहे. त्यामुळे स्वाभिमान राजकारणात राहिलेला नाही. विचारधारा उद्धवस्त झालेली आहे.

सर्वच घराणेशाही टिकली पाहिजे, याची सर्वांनी काळजी घेतलेली आहे. आम्ही आणि आमची पिढी याचाही विचार सर्व मिळून करत आहेत. त्यामुळे कुणी कुणाच्याही गळ्यात पडायला लागला आहे. नवं उभा राहता कामा नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सर्वसामान्य नेतृत्व उभाच राहू देईच नाही हे ठरवून केलं जात आहे. अखेर परिवार घराणे याचाच आज डंका वाजता दिसतोय.

पुढचे तीस वर्ष या सगळ्यांचे लेकरं महाराष्ट्र चालवणार आहेत, ज्यांना ऊस, भुईमूग कुठं येतो याचंही आकलन नाही. प्रत्येक कुटुंबांच्या आंधळ्या भक्तांच्या फौजा तयार झाल्या. ढुंगणावर लाथा खावून घेण्यात त्यांना धन्यता वाटायला लागली. मुळात कधी कधी गुलामाला गुलामी हाच आत्मसन्मान वाटू लागतो त्यातली ही गत झालेली आहे. पोटतिडकीने लढणारे लोक येते टिकू दिले नाहीत, ज्यांना प्रश्नाची जनतेची जाण आहे. शेतकरी, मजुरांच्या व्यथा बघून डोळ्यात पाणी येतं त्या नवं नेतृत्वाना उभाच राहू देईच नाही.

एखाद्याच्या अस्तित्वाची भीती वाटू लागावी अन् त्यातून सरेंडर अवस्था निर्माण व्हावी ही खुप मोठ्या भीतीचे द्योतक आहे. आज सगळेच सरेंडर का झालेत? येते निर्माण होणाऱ्या नव्या पर्यायाची धास्ती प्रस्तापित कुटुंबांना घ्यावी लागली. त्यातून तोंड फुटे पर्यंत ही पळापळ सुरू झाली. नव्या कार्यकत्यांनी बंड करायचा सोडून नांग्या टाकून नेते वाटून घेण्यात धन्यता मानली.

गुलामित धन्य असलेल्या गुलाम स्वाभिमान्यानो, आता हुजगेगिरीची सवय लावत चला आणि गांडीवर लाथ घातली की ती शबासकी म्हणून मिरवत चला. पुढचे तीस वर्ष लेकरांच्या गाड्यांचे दरवाजे खोलता खोलता खपवून जा. तुमच्या म्हढ्यावर फुल टाकायला सुद्धा ते येणार नाहीत हे आताच मी सांगून देतो.

दोष त्यांचा नाहीच,

दोष आहे भक्त गुलामाचा…

  • दिपक केदार

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!