ऑल इंडिया पँथर सेना फोडण्यासाठी मनुवादी सक्रिय!

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना अवघ्या काही काळात देशातल्या चार राज्यात झपाट्याने वाढली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात मनुवादी प्रवृत्ती विरोधात अतिशय नियोजनबध्द असा लढा दीला जात आहे. वैचारिकता, आक्रमकता ही प्रमुख ओळख या संघटनेची झालेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचा पदाधिकारी यांच्याकडे अतिशय महत्वाचा सैनिक म्हणून पाहिले जात आहे. समाजात या संघटनेच्या कार्यकर्त्यांना एक वेगळीच आपुलकी मिळत आहे, त्यामागे दिपक केदार यांचे खुप मोठे योगदान आहे.
ऑल इंडिया पँथर सेना परिपक्व कार्यकर्ता तयार करण्याची जणू फॅक्टरी झालेली आहे. दिपक केदार हे मनुवादी विरोधात लढतात हे काही मनुवादी पक्षाला सहन होत नाही. त्यांनी अनेक वेळा दिपक केदार यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, खोट्या केसेस करून जेलमध्ये टाकून बघितले तरीही हे वादळ त्यांना रोखता आले नाही. म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना थेट ऑफर देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाडा मासाचा एकही कार्यकर्ता फुटत नाही, एखादा लिंबू टिंबु गळाला लागला की त्याला सुद्धा हे बाशिंग बांधायला तयार आहेत एवढी बिकट अवस्था काही मंडळींची झाली आहे. केवळ त्याला ऑल इंडिया पँथर सेनेचे लेबल आहे, म्हणून त्याला घेत आहेत.
यावर महाराष्ट्र प्रवक्ता बंटी दादा सदाशिवे यांनी सांगितले, आमची संघटना स्वाभिमानी आहे, येते चोरांना स्थान नाही. चोरांना जिथे स्थान आहे ते तिथे जात आहेत. आम्हाला अभिमान वाटतो ऊसतोड मजुरांचा पोरगा आमचा नेता, ज्या कार्यकर्त्यांना घडवतो त्यांना अनेक पक्ष आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतात. हे आमचं यश समजतो, ऑल इंडिया पँथर सेना कार्यकर्ता निर्मितीची फॅक्टरी आहे. अनेकांना आमचे नेते दिपक केदार चालत नाहीत पण त्यांचे कार्यकर्ते चालतात. हा तर दरारा आहे, ही तर भीती आहे. आम्ही आरएसएस विरोधात लढतो हे काही मनुवादी पक्षांना, ब्राह्मणवादी पक्षांना आवडत नाही, त्याचमुळे आमचे कार्यकर्ते फोडण्यासाठी राज्य स्तरावर मीटिंग घेऊन प्लॅनिंग केलं जातं आहे, पण आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाहीत. त्यांना लढाऊ नेता हवा आहे आणि ते दिपक केदार आहेत.