लोकशाही रुजली तरच स्वातंत्र्याला महत्व अन्यथा विषमता राज्य भारतातील मोठ्या समूहाला गुलाम करेल – दिपक केदार

पुणे : येथील समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी सुसंगत व्हावी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. लोकशाहीचा इव्हेंट अपेक्षित नव्हता.
स्वातंत्र्य सेनानी लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर देशांतर्गत विषमतावादी, धर्मसत्तावाद्यांनी देश काबीज केला. मोठा समुह कायम गुलामीत आहे. विषमता भारतातच भारताला पारतंत्र्यात घेऊन जाणारी आहे.
“मी भारतीय नागरिक” ही ओळख गडद झाली पाहिजे, धर्माची ओळख गडद करण्याची स्पर्धा देशात सुरू आहे, आणि ती धर्मसत्ता स्वतंत्र भारताला घातक आहे.
विचारधारेचे युद्ध “मी भारतीय” येते येऊन थांबले पाहिजे, पण एका दिवसापुरते इव्हेंट पुरते भारतीय झालेले दुसऱ्या दिवशी धर्माचे होऊन जातात.
‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: भारतीय’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विधान रुजणे काळाची गरज आहे. विषमता नष्ट होणे, संसदीय लोकशाही समाजव्यवस्थेत रुजवने, जातीयता नष्ट होणे, भारतीय स्वातंत्र्य शेवटच्या समूहाला मुख्य प्रवाहात आणणे, स्वातंत्र्याचा इव्हेंट न होता वास्तव स्वतंत्र रुजवणे काळाची गरज आहे.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी ‘मी प्रथम भारतीय आणि अंतीमत: भारतीय’ हीच माझी ओळख!
सर्व भारतीयाना ऑल इंडिया पैंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी शुभेच्छा दिल्या!