Uncategorizedचळवळ
राजस्थान दलित हत्याकांड झालं तुम्ही मुंबईत काय करता दिपक केदार यांचा गृहमंत्री अमित शहा ना सवाल!

मुंबई : भारताचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत लालबाग राजा गणपतीच्या आरतीसाठी येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची जयत तयारी सुरू आहे. त्यांचं भोजन, त्यांचं पुढील बीएमसी निवडणुकीचे नियोजन यासाठी दौरा आहे.
या दौऱ्याचा धर्मसत्तेचा दौरा म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. नऊ वर्षाच्या दलित चिमुरड्याला मटक्यातल पाणी पिल्ल म्हणून त्यांचं हत्याकांड केलं, जागतिक स्तरावर आंदोलन झाले पण हे गृहमंत्री बोलले नाहीत. वाटलं होत पीडितांच्या घरी जातील अन् मग मुंबईला येतील पण यांना धर्मसत्ता महत्वाची आहे त्यामुळे हे असंवेदनशील आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांनी आधी राजस्थान गेले पाहिजे होते ते मुंबईत आले त्यांचा दौरा धर्मसत्तेचा दौरा आहे जनतेचा नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.