जयभीम आक्रोश मोर्चाने मेहकर बुलढाणा हादरले!

मेहकर : मुळी गावात पोळा सणादिवशी तोरणा खाली महारांचा बैल गेला म्हणून जातियतेतून हाणामारी जातीवाचक शिवीगाळ झाली. यात एक संतापजनक व्हिडिओ वायरल झाला, ज्यात 80 वर्षाच्या वृध्द बौद्ध आजोबाला अन् 70 वर्षीय वयस्कर बौध्द महिलेला दोन जातीय गावगुंड लाठ्या काठ्याने मारत होते व्हिडिओ मध्ये आरोपीने अतिशय क्रूरपणे हल्ला केलेला दिसत होता.
त्या व्हिडिओ मधील दोन आरोपींना अटक करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली होती. तीन दिवस उलटून ही आरोपी अटक झाले नाहीत. या घटनेचा निषेध म्हणून जयभीम आक्रोश मोर्चाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष घाटावरचा यांनी आयोजन केले होते. नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार करणार होते. केदार यांनी त्यांच्या वॉलवरून मोर्चाला येण्याचे आव्हान सुद्धा केले होते.
दोन दिवस शांत असलेली पोलीस मोर्चाच्या आदल्या रात्री नऊ च्या दरम्यान जिल्हा अध्यक्ष काकडे सह अनेक कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस देऊन मोर्चा रद्द करण्याची भूमिका मांडत होते. मोर्चावर आयोजक ठाम होते.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार ताब्यात
पोलीसांनी मोर्चा रोखण्यासाठी फिल्डिंग लावली, औरंगाबाद, जालना मार्गे मेहकर निघालेले केदार यांना दोन चेकपोस्ट लाऊन रोखले. पहिल्या चेकपोस्टवर गाडी जाऊ दिली. पण दुसऱ्या चेकपोस्ट ला गाडी रोखली. गाडी बदलून आलेले केदार किनगाव राजा पोलिसांनी ओळखले आणि त्यांना ताब्यात घेतले. तीन तास मोर्चा रद्द करा म्हणत वेळ घालवण्याचे प्रशासन षडयंत्र केले. किनगाव राजा पोलीस स्टेशन ला छावणीचे स्वरूप आले होते, डीवायएसपी यामवार, पोलीस निरीक्षक मेहकर निर्मला परदेशी, पो. नि. गोंधे, वाघ, रबडे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची माहिती केदार यांना दिली आणि विनंती केली की मोर्चा थांबवा आम्ही पुढे जाऊ देणार नाहीत.
दिपक केदार यांनी खेळली खेळी पोलीस स्टेशनला आंदोलन थांबवतोय घोषणा केली अन् बाहेर पडून थेट मेहकर गाठले. किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिपक केदार ताब्यात या फेसबुक पोस्ट वायरल मुळे राज्यातील कार्यकर्ते चळवळ सक्रिय झाली आणि सिंदखेड राजा, लोणार, किनगाव झट्टू, किनगाव राजा, आजूबाजूच्या परिसरातून हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनकडे धावून आले. त्यामुळे दिपक केदार मोठ्या गाड्यांच्या ताफ्यात मेहकर ला पोहोचले. यावेळी पोलिसांची पळापळ झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा वाटिका येते जयभीम आक्रोश
दिपक केदार यांची एंट्री होताच एकच आवाज घुमत होता “जयभीम” एकदम हजारो तरुण महिला वृद्ध दिसताच दुकान बंद झाली अन् केदार यांनी पुतळ्याला अभिवादन करून धडाकेबाज भाषण केले.
सुरवातीला जोरात घोषणा दिपक केदार यांनी दिली आणि त्या घोषणेच्या अफाट जयघोष नंतर आवाजाने एकदम शांतता पसरली.
दम असेल तर ये : जातीयवादी तू आमच्या आजी आजोबाला मरतो दम असेल तर आता येते ये तुला दाखवतो. समाजाच्या केसालाही धक्का मी लागू देणार नाही. जातीय कृत्य थांबवा अन्यथा पँथर दणका देऊ. आमदार खासदाराने आरोपीला पाठीशी घालू नये त्यांनी ही ताकद बघावी आणि आमच्या नादाला लागू नये. आताच पोलीसांनी मला आश्वासन दिले आहे की आम्ही तात्काळ आरोपीला अटक करू मी त्यांना सांगून आलोय जर का आरोपी तात्काळ अटक झाले नाही तर बुलढाणा येते मोर्चा काढून उत्तर देईल त्यावेळी हिंमत असेल तर फक्त रोखून दाखवा. आंदोलन म्हंटले की त्याला दडपून टाकण्याची फॅशन झालेली आहे.
सकाळी मला ताब्यात घेऊन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलकांना घरी पाठवले, आमचे आंदोलन यशस्वी झाले. सर्व पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला चॅलेंज आहे, पंधरा दिवसात मुंबईला येतोय हिंमत असेल तर रोखून दाखवा. जात घालवण्याची लस आणा, जातीच्या कोरोनाने आमचे बळी घेतलेत. मला अडवणार हे माहीत होत म्हणून गाडी बदलून आलो ते Scorpio बघत होते मी स्विफ्ट घेऊन आलो, ते निळा रुमाल गळ्यात बघत होते मी टीशर्ट घालून आलो. आज रोखलत बुलढाण्यात बघा कशा उगवतोय. समाजाने एकत्र येऊन मला साथ द्यावी मी सर्व घटनांना भेटलो समाजाचं दुःख वेदना मी बघतोय, अशाच ताकतीने लढू आणि जिंकू. बुलढाणा आमचा बालेकिल्ला आहे, येते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचीच ताकद हे आज दाखवून दिले.
मी थांबणार नाही, मी बटीक नाही, मी दलालांच्या दारात जात नाही माझा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून चवदार तळ्याचे पाणी मला पाजलेले आहे त्यांची मी ऑलाद आहे.
सगळ्यांचा हिशोब केला जाईल. सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पँथर शहीदांची मी आऊलाद आहे. घाबरून गप्प बसणार नाही जोपर्यंत जीव आहे याच पुतळ्याखाली जयभीम म्हणत राहील. मुळी प्रकरणतील आरोपींना अटक करा, पीडितांना पोलीस संरक्षण द्या, जिल्ह्यातील जातीयता बंद करा अशी मागणी त्यांनी भाषणात केली. अफाट गर्दी होती पण केदार यांनी ती कंट्रोल मध्ये ठेवली आणि सर्वांना शांततेत घरी पाठवले एकही केदार यांच्या शब्दाबाहेर गेले नाहीत.
महिलांनी केदार यांच्या डोक्यावरून हात फिरवले केदार यांची एंट्री होताच संख्येने उपस्थित असलेल्या महिला त्यांच्याकडे आल्या. कुणी डोक्यावरून कुणी हातात हात जोडून जयभीम केला. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे , जिल्हाध्यक्ष अमित काकडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश धूंदले, राहुल वानखेडे, विजय वानखेडे, अतुल इंगळे यांनी हे आंदोलन यशस्वी केले. शेकडो कार्यकर्त्यांनी यात लढा दिला.