लातूर लोकसभा दिपक केदार यांनी लढवावी – कुणाल इंगळे

लातूर : ऑल इंडिया पँथर सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष कुणाल इंगळे यांनी लातूर हे दलित अत्याचाराचे केंद्र झाले असून सर्वात जास्त अन्याय अत्याचाराला वाचा फोडून मोर्चे आंदोलने काढून दिपक केदार यांनी लातूर मधील मनुवादी प्रवृत्तीला ठेचण्याचे काम केले. राज्यातील दलित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन घटकांसाठी हा आवाज संसदेत जाणे काळाची गरज आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांची भूमिका : लातुर जिल्हातील समग्र बहुजन समाजाच्या वतीने ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने लातुर (राखीव मतदारसंघातुन) ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे नेते आदरणीय दिपकजी केदार साहेब यांनी लातुर (राखीव मतदारसंघातुन) लोकसभा निवडणूक लढवावी आशी आमची आणि समग्र बहुजन समाजाच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत.!लातुर जिल्हात दलित अत्याचाराचं भंयान थैमान पसरलेलं आहे.लातुर जिल्हाला बहुजनांचा वाली नसुनप्रस्थापित घराणेशाहीची वाढलेली मक्तेदारी आम्हाला दिसुन येते,लातुर जिल्हा दलित अत्याचार म्हणुन तात्काळ घोषित करण्यात यावं.!लातुर जिल्हात बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात,ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिपकजी केदार साहेब यांच्या नेतृत्व खाली हजारो प्रश्न घेवुन आंदोलन,मोर्चाच्या स्वारुपात दलित अत्याचारांच्या विरोधात भुमिका मांडली,व न्याय देण्याच काम त्यांना लातुर जिल्हात केलं आहे.!वंचित,शोषित,पिडितांच्या,न्याय हक्कासाठी बहुजन समाजाच्या विविध मागण्या घेवुन मंञालयसह,लातुर जिल्हात तब्बल हजारोच्या संख्येने लातुर जिल्हात तीन ते चार मोर्चचं आयोजनांसह लातुर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठा जन उठाव करण्यात आला.!लातुर जिल्हातील दहा तालुक्यात ऑल इंडिया पँथर सेनेची एक मोठं व्यापक संघटनेची ताकत लातुर जिल्हात निर्माण झाली आहे.!सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,शेतकरी,कामगार,बेरोजगार,दलित,वंचित,शोषित,मुस्लिम,आदिवासीसह,अठरापगड,समुहाला सोबत घेवुन लातुर जिल्हातील प्रश्नांना मोठया प्रमाणात वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे,एवढचं नव्हेतर लातुर जिल्हात गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात आले.आज रोजी 150 च्या वर ऑल इंडिया पँथर सेनेच्या शाखेचे अनावरण झालेलं दिसुन येते.रक्तदान,अन्नादान,व इतर शबीर रमाई घरकुल आवास योजनासह,वृक्ष लागवडी,निराधार योजन अंतर्गत गोरंगरिबांची सेवा करण्याच काम ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. वंचित,शोषित,पिडितांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रचं नव्हेतर देशात पायाला भिंगरी बांधुन घरादारांचा विचार न करता हा नेता संविधान बचाओ हि भुमिका मनी बाळगुन आज रोजी संघर्षातुन झुंज देत आहे.यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.!कोणत्याही गोष्टीचा गर्व न बाळगता, प्रत्येक युवकाच्या मनावर राज्य करणारे,तसेच प्रत्येकाच्या आडचनीला धावून येणारे सर्वसामान कुटुंबातून येऊन आज तळागाळात (संपूर्ण देशभरात) ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून आपले नाव लौकिक करणारे, म्हणतात ना कि,नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही,ते स्वतःलाच निर्माण करावे लागते,आसे,लांखो युवकांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राची शान तथा लातुर जिल्ह्याचे भावी खासदार,आदरणीय दिपकजी केदार साहेब,आपण लातुर जिल्हातुन राखीव मतदारसंघातुन लोकसभा निवडणूक लढवावी अशी पुन्हा एकदा आंबेडकरी समाजाच्या वतीने मी आपणास आग्रहाचे निमंत्रण करतो आणि इथेच थांबतो.!
जयभीम जय संविधान..-
कुणालभैय्या इंगळे
जिल्हाध्यक्ष,ऑल इंडिया पँथर सेना