विश्वव्यापी महामानवाला जन्माच्या वादात आडकुन कमी लेखू नका!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू मध्यप्रदेश ला झाला म्हणत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रापासून तोडणे निंदनीय आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विश्वरत्न म्हणतो, त्यामुळे ते विश्वाचे रत्न आहेत. भाजपने महामानवाच्या जन्माबद्दल वाद निर्माण करून त्यांना कमी लेखण्याचा खोडसाळपणा करू नये.
भाजप आंदोलन एक ढोंग आहे. देशात महामानवाच्या अनुयायांना मारलं जातं तेव्हा भाजप मुग गिळून गप्प बसलेली असते. गेल्या आठ वर्षांत मन की बात मध्ये एकदा तरी पंतप्रधानाने दलितांच्या कत्तली बद्दल भूमिका मांडली का? मुंबईत पायल तडवी ने मनुवादी प्रवृतीला कंटाळून सुसाईड केलं तेव्हा कुठे होतात? आशिष शेलार?
पीएचडी स्कॉलर रोहिथ वेमुला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊनच आंदोलनाला बसला होता त्याचं काय केलं तुम्ही संस्थात्मक हत्या केली तेंव्हा कुठे होतात? राज्यात हजारो हत्याकांड महामानवाच्या लेकरांचे जातीमुळे झाले, आंदोलन का केले नाही? संविधान जाळलं तुम्ही काय केलं? तुमच्या खासदारांने आम्ही संविधान बदलायला आलोय म्हणून जाहीर सभेत सांगितले, तुम्ही प्रेस घेऊन खुलासा केला का? तुमच्या सरकारमध्ये किती बौध्द मंत्री आहेत याचा खुलासा करा एकही बौध्द मंत्र्याला तुम्ही संधी दिली नाही.
आशिष शेलार पत्रकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने हरवलं म्हणून सांगतात त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला तुम्ही लोकसभेत का पाठवलं नाही? अकोल्यात तिथे का उमेदवार देत राहिलात?
आंबेडकरी जनता तुमच्या आंदोलनात येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वाचे रत्न आहेत, जाणिवपूर्वक महू महू करून त्यांना कमी लेखण्याचा खोडसाळपणा करू नका.
राज्यपालांना वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म मुद्द्याचा सहारा घेऊ नका.
सावरकरांवर पुणे आंदोलनात एका महिलेने चपल उगारली त्यासाठी आंदोलन करायचे असते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सत्ता म्हणून भाजपचे आहे आणि भाजपचं आंदोलन करून राज्याला धोक्यात घालत आहे हे दुर्दैव आहे. निषेधार्थ आहे!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना