महाराष्ट्र

लाज वाटली पाहिजे – दिपक केदार यांची तीव्र प्रतिक्रिया

पुणे : दोन दिवस झालं बघतोय महाराष्ट्राचा मुद्दा काय तर शीतल म्हात्रे? हा काय मुद्दा आहे का? आज तर हद्द झाली शंभूराजे देसाई वायरल व्हिडिओ बद्दल एसआयटी चौकशी ची भूमिका अधिवेशनात मांडली.

वाशिमला बौध्द उपसरपंच दिवसाढवळ्या अपहरण करून मारून टाकला, भोकरदनला एक तरुण मारून विहिरीत फेकला, कल्याणला पोलीस स्टेशनला बौध्द वृध्द मारला यावर कोण बोलणार? बिल्कीस बानो चे शिक्षा झालेले आरोपी मोकाट सोडलेत, मनीषा वलमिकीची जीभ छाटून हत्या झाली त्यातली तीन आरोपी निर्दोष सोडलेत कुणी चिंता व्यक्त केली.

हे शिवसेनेचे आमदार मुंबईला आदिवासी पायल तडवीने फाशी घेतली काय भुमिका बजावली होती आणि आज शीतल म्हात्रे मुद्दा महत्वाचा वाटतो. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, दलित अत्याचार, महागाई यावर बोलणार नाहीत. शीतल म्हात्रे दोन दिवस राज्याचा मुद्दा होत असेल तर अशा लोकप्रतिनिधींची लाज वाटते लाज…

अशा तीव्र शब्दात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी निषेध नोंदवला!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!