उसाच्या बैलगाडीवरुन पडून मुलीचा दुर्दैवी अंत!

शिरूर कासार : मानवतेला हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. बीड जिल्हा ऊसतोड मुजरांचा जिल्हा या जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंग येथील ऊसतोड मजुराची मुलगी ऊसाच्या बैलगाडी वरुन पडून मृत्युमुखी पडली. सातारा जिल्ह्यातील कराड साखर कारखान्याच्या परिसरातील ही घटना आहे.
वय वर्ष 9 असलेली देवियानी भाऊसाहेब गायकवाड असं या चिमुरडीचे नाव आहे. 10 वर्षांपासून भाऊसाहेब गायकवाड उस्तोडी करतात. इयत्ता चौथीत जिल्हा परिषद शाळेत शिकणारी ही चिमुरडी आजीच्या निधनानंतर कुणीच सांभाळ करायला नाही म्हणून कारखान्यावर आई बापाकडे आली होती.
कृष्णा साखर कारखाना येथील ही घटना आहे. अतिशय दुःखद वातावरणात देवियानी वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली पर पोस्ट टाकली.
“
माझ्यासाठी सर्वात मोठी दुःखाची घटना ही आहे. याची चर्चा महाराष्ट्रात कुठेच नाही, आमचं सामाजिक जीवन असं उद्धवस्त अवस्थेत आहे. शिकण्याचं वय असलेली चिमुरडी ऊसाच्या गाडीवरून पडून मरते यापेक्षा या राज्याचं दुर्दैव नसेल. राज्य सरकारने अशा घटनांची गांभीर्याने नोंद घ्यावी. ऊसतोड मजुरांच्या लेकरांना शिक्षण, आरोग्य, वसतिगृह देऊन त्यांचा जीव वाचवावा.
मला माहित आहे या निर्दयी व्यवस्थेला यापेक्षा शीतल म्हात्रे चा मुद्दा महत्वाचा वाटेल. त्यासाठी दोन दिवस राज्य वेठीस धरतील पण ही घटना त्यांना काहीच वाटणार नाही. संवेदनशील व्हाल सरकार मायबाप अन् हे दीन दलितांचे, गोरगरिबांचे हे लेकरं वाचवा.
आमचे सामाजिक प्रश्न किती ज्वलंत आहेत, त्याच हे उदाहरण आहे. ऊसतोड मुजरांच्या जिण्याला मानवतेच्या दृष्टीतून बघा. साखर शाळा काय झाल्या, का असे लेकरं भटकंती करतायत यावर भूमिका घ्या!”
भावपूर्ण श्रद्धांजली!