महाराष्ट्र

दंगल नको, भाकर द्या; दिपक केदार यांच्या भूमिकेमुळे दंगलखोर पसार

औरंगाबाद : मिडीयाला प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी अतिशय मार्मिक आणि विचार करणारे मत मांडले ज्यामुळे नामांतर वादाला वेगळेच वळण लागले आहे. लोकं या मताचा विचार करू लागले आहेत.

औरंगाबाद नामांतर वादावर प्रतिक्रिया देताना आरएसएस सत्तेसाठी हिंदु मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्हाला नामांतर नको, आम्हाला दंगल नको भाकर द्या, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला शांतता हवी म्हणत त्यांनी आरएसएस वर हल्लाबोल केला. रेशीम बाग, प्रल्हाद भवन, हेडगेवार हॉस्पिटल यांचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव का दिले नाहीत.

सगळे प्रयोग मराठवाड्यावर केले जातात, पश्चिम महाराष्ट्रात पाणी, ऊस, कारखाने, रोजगार, नागपूरला कंपन्या रस्ते औरंगाबाद ला मात्र दंगल आणि राजकीय सत्तेसाठी दंगलीचे प्रयोग केले जातात हा सुनियोजित कट आहे. सामाजिक स्तीथी बिघडल्यामुळे येते उदोग येत नाहीत. आमच्या भूमिपुत्रांना पुणे, मुंबई, गुजरात ला जावं लागतं. दर दर भटकाव लागतं ते मराठा आहेत ते अठरा पगड जातीचे बहुजन मावळे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरं आहेत. मराठवाड्यात आम्हाला रोजगार नाही, दंगल हा एकमेव कार्यक्रम आहे. नामांतर नको आम्हाला रोजगार द्या!

मुस्लिम नावाशी तिटकारा आहे तर मग गुजरात मधील अहमदाबाद का बदलत नाहीत. तिथे वाद नको तिथे कंपन्या येतील आणि आमच्याकडे वाद आणून कंपन्या पळवतील. आरएसएसने सत्तेसाठी आमच्या तरुणांचा छळ थांबवावा. एवढ्या वर्ष डिग्र्यावरील औरंगाबाद नाव लमिनेशन करून ठेवलं, नोकऱ्या केल्या, तेव्हां कुणाला औरंगजेब चे नाव डिग्री वर आहे, असं वाटलं नाही, आजच पुणे, मुंबई, औरंगाबाद निवडणुकीच्या तोंडावर नावाचा वाद कशा काय सुरू झालाय?

नौटंकी थांबवा अन्यथा आम्ही सुद्धा दंगल की भाकर? दंगल की रोजगार? नावाने आंदोलनात्मक भूमिका घेऊ. हाताला काम नाही म्हणून कामगार नाक्यावरून लोक घरी जातात त्यांचे लेकरं उपाशी आहेत याचं भान ठेवा. आम्हाला गरज जगण्याची आहे आमच्यावर असले प्रयोग करून शेतकरी बहुजन मावळ्यांचे लेकरं दंगलीत जेलमध्ये घालू नका. बाहेर राज्यातून भडकाऊ लोकं येते पाचारण करून औरंगाबादला वेठीस धरू नका.

असे सडेतोड मत दिपक केदार यांनी एका यूट्यूब चॅनेलला प्रतिक्रिया देताना मांडले ते सोशल मिडियात अफाट वायरल होत आहे. दिपक केदार यांचे संवेदनशील मानवतावादी लोकांनी स्वागत केले आहे. सगळेच मनसुभे उघडे केल्यामुळे दंगलखोर तोंडावर पडले आहेत. औरंगाबाद दंगलीपासून वाचवण्यासाठी दिपक केदार यांची भूमिका अतिशय महत्वाची राहिली आहे. लोकांना या दंगलखोर प्रवृतीपासून सावधान करण्याचे मोठे कार्य या भूमिकेतून झाले आहे, त्यामुळे दंगलखोर बिळात घुसण्याच्या तयारीत आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!