उदगीर मध्ये पुतळा मधोमध निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचा मोर्चा

उदगीर : अनेक वर्षांपासून आंबेडकरी अनुयायांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नांदेड बिदर महामार्गावर मधोमध असावा अशी मागणी केलेली आहे. हा पुतळा मध्यभागी असावा म्हणून 20 वर्षांपूर्वी शहीद यशवंत शिंदे या भीमसैनिक आंदोलकांनी उपोषण सुरू केले. उपोषण करताना तो शहीद झाला. तेव्हापासून आजपर्यंत ही मागणी होत आहे. अनेक पुतळे रस्त्याच्या मधोमध आहेत पण केवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मध्यभागी आणण्यासाठी उदासीन आहेत.
ऑल इंडिया पँथर सेनेनी खाजगीत समाजाची खदखद ओळखून या मागणीसाठी लढा उभा केला आहे. हा राखीव मतदार संघ आहे येते बौध्द समाजाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे आहेत, महाविकास आघाडी सरकारमध्ये हे आमदार राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. हा पुतळा मध्यभागी आणणे त्यांच्यासाठी एका चूटकीचे काम होते पण त्यांची मानसिकता अतिशय दुर्दैवी निघाली आणि त्यांनी शहीद झालेल्या यशवंत शिंदेचे बलिदान विसरण्याचे काम केले. त्यांनी हा पुतळा मध्यभागी निर्माण केलाच नाही, आजही त्यांची भूमिका तशी दिसत नाही त्यामुळे उदगीर येथील समाजाने निळा जनउठाव मोर्चा काढून राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांना नेतृत्व दिले.
या मोर्चामध्ये समाजाच्या मूलभूत हक्काच्या 30 मागण्या होत्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघाला, जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून नगरपरिषद समोरील बसवेश्वर अण्णा पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी भाषणे झाली.
शहीद यशवंत शिंदेचे भाऊ रजनीकांत शिंदे म्हणाले माझा भाऊ तडफडून मेला तरी त्याची मागणी आजही मान्य झालेली नाही. हा पुतळा भव्य स्वरूपात मधोमध ज्या दिवशी होईल तेव्हाच यशवंत शिंदेचे आंदोलन थांबेल अन्यथा दोन भाऊ गेले मी ही जाईल पण लढत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजा ढालेंच्या कार्यकाळातील पँथर बापूसाहेब यांनी तुफान भाषण केले. आमदार आमचा राहिला नाही, आम्हाला जीआर च्या नावाखाली दिशाभूल केली जाते. पुतळा मधोमध झाला पाहिजे अन्यथा मी नगरपरिषद सीइओ च्या केबिन मध्ये आत्मदहन करेल अशा इशाराच त्यांनी दिला.
लेडी पँथर प्रमुख मायाताई कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले त्यांनी अतिशय पोटतिडकीने मुद्दा मांडला की तेजस्विनी लामतुरे या आमच्या बहिणीला न्याय मिळावा तिचा आरोपी अटक व्हावा यासाठी आम्ही आंदोलन केले. आमच्या 10 महीलांसहीत भंते वर गुन्हा नोंद करून धमकवण्याचा खेळ सुरू केला आहे. असं असेल तर आम्ही न्याय कुठे मागायचा? असे मत त्यानी व्यक्त केले.
ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आक्रमक शैलीमध्ये आक्रमकपणे आपले भाषण केले त्यांनी सांगितले पहिल्यांदा आमचा बौध्द आमदार असून मोर्चा काढावा लागतोय हेच आमचे दुर्दैव आहे. आता ते आपले राहिलेत की नाही हा प्रश्न आहे. याआधी भाजपचा सुधाकर भालेराव म्हणून आमदार होता आता बौध्द समजाचे राज्यमंत्री संजय बनसोडे होते तरी या दोघांनी हा पुतळा मध्यभागी आणला नाही. यांची मुळातच मानसिकता नाही. अरे मी आमदार असतो तर पाहिले काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मधोमध आणला असता पण आता काही लोकांना आमच्या प्रश्नांची लाज वाटायला लागली आहे.
पुतळा मधोमध करा तरच तुम्ही पुढे आमदार व्हाल, समाजावरील अन्याय थांबवा, अन्यथा मी स्वतः मैदानात उतरेल, त्यादिवशी तुमचा खेळ झाला म्हणून समजा…
कशाला भिताय भीती वाटत असेल तर मी मागे आहे. तुम्ही सगळे आता या लढ्यात सामील व्हा अन्यथा तुमचा बुरका समाजासमोर फाटला म्हणून समजा याद राखा उगाच आमच्या नादी लागू नका याचे परिणाम वाईट होतील
उदगीर चळवळीचे केंद्र आहे, केसेसचा धमक्या देऊ नका, डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस आहेत पण आम्ही लढतोय कारण आम्ही ठरवलं लढत लढत मारायचं.
तेजस्विनी लामतुरे ही महिला एका नराधमाने तिचा वापर केला, जबरी बलात्कार केला, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं. ही बौध्द आहे माझं काय बिघडवणार या मानसिकतेतून तिचा अतोनात छळ केला तिने सहा महिने झालं फाशी घेतली आज सहा महिने झालं मुख्य आरोपी फरार आहे. नुकतच देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्ष फरार असलेला जयसिंघाणी याला अटक केली. आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करत आहे म्हणत त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. फडणवीस जसे अमृता फडणवीस यांना बायको म्हणून न्याय देतात तसे तेजसिविनीला आपली बहीण समजून न्याय का देत नाहीत. याद राखा येणाऱ्या काही तासात आरोपी अटक करा अन्यथा गाठ पँथरशी आहे.
आज मीडिया नाही, मोर्चा त्यांना दिसत नाही. कारण तो रोजगार, महागाई, साठी नसतो तो पाडा पाडी साठी असतो तो मिडीयाला हवा आहे. साडे चार वर्ष घरात बसलेले काय विकास करणार त्यांना ऊन लागत नाही म्हणून आजारी पडतात. आज मीडिया नाही हे निंदनीय आहे. ही चळवळीची अवस्था आहे…
महिला आयोग रुपलिताई चाकण कर यांना दलित महिला मुलींवरील बलात्कार अन्याय अत्याचार कधीच दिसत नाही त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. अवघड वाटतं मानवता आपली बहीण म्हणून कुणी लढणार आहे की नाही आणि त्या निरागस तरुणीला न्याय देणार की नाही याच उत्तर द्या!
असे परखड मत त्यांनी मांडले. यावेळी महारष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, जिल्हा अध्यक्ष कुणाला इंगळे, प्रीतम सूर्यवंशी…