राजेंद्र हगवणेची संपत्ती जप्त करा, वैष्णवी हगवणे प्रकरणात कठोर कारवाईची मागणी – दिपक केदार

धुळे, 23 मे 2025: ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी धुळे विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आणि हगवणेची संपत्ती तात्काळ जप्त करण्याची मागणी केली. त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका करत अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आवाहन केले आणि हुंडाबळीविरोधात कठोर कायद्याची मागणी केली.
वैष्णवी हगवणे प्रकरण: हत्या की आत्महत्या?दीपक केदार यांनी सांगितले की, वैष्णवी हगवणे हिच्या अंगावर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच जखमा आढळසासरच्यांकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याची तक्रार वैष्णवीने मृत्यूपूर्वी बावधन पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पोस्टमॉर्टम अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. केदार यांनी प्रश्न उपस्थित केला की, “वैष्णवीला हळूहळू मारण्यात आले. अशा किती वैष्णवी या राज्यात गुदमरत आहेत? सरकारने याकडे लक्ष द्यावे.”महिला आयोग आणि सरकारवर टीकाकेदार यांनी महाराष्ट्र महिला आयोगावर निष्क्रियतेचा आणि असंवेदनशीलतेचा आरोप केला. ते म्हणाले, “महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा.” त्यांनी बीडमधील खोक्याच्या घरावर जेसीबीने कारवाई केली गेली, मग राजेंद्र हगवणेचे घर का पाडले जात नाही, असा सवाल उपस्थित केला.
हुंडाबळीविरोधात कठोर कायद्याची मागणी केदार यांनी हुंडाबळीला प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, “नेते सहज फॉर्च्युनर गाडीची चावी नवरदेवाला देतात, हसतात, किस्से सांगतात आणि निघून जातात. त्यांना सामाजिक बांधिलकी किंवा समाज परिवर्तनाची गरज वाटत नाही.” त्यांनी हुंडाबळीविरोधात ‘जिजामाता’च्या नावाने कठोर कायदा बनवण्याची मागणी केली, ज्यात संपत्ती जप्ती आणि हत्येच्या प्रकरणात फाशीची तरतूद असावी.
सामाजिक प्रबोधनाचा अभाव केदार यांनी समाजातील मुलींच्या दुय्यम स्थानावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मुलींना आपल्या पालकांना त्रास होऊ नये म्हणून त्या गप्प बसतात. वैष्णवीला बोलायलाही कोणी नव्हते. तिच्या मैत्रिणींना लपूनछपून व्यक्त व्हावे लागते. ही सामाजिक प्रबोधनाची कमतरता आहे.” त्यांनी अशा महागड्या विवाहांवर आयकर विभाग आणि इतर यंत्रणांचा अंकुश नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
यांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक यांच्यावर वैष्णवीच्या हत्येचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, हगवणेंना अजित पवार आणि महिला आयोगाच्या पाठिंब्यामुळे बिनधास्तपणा होता. “वैष्णवीच्या मृत्यूनंतरही हगवणेंना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करून मोठा संदेश द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
सखोल चौकशीची मागणी केदार यांनी वैष्णवी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “वैष्णवीसोबत काय झाले, तिची हत्या झाली की काय, याची तपासणी झाली पाहिजे.” त्यांनी राजकीय दबावामुळे पोलिसांवर होणारा परिणाम आणि सामाजिक सुधारणांचा अभाव यावरही चिंता व्यक्त केली.