Uncategorized

धुळे गुलमोहर विश्रामगृह प्रकरणी दीपक केदार यांचा संताप; भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध!

धुळे, 23 मे 2025: धुळे येथील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या करोडो रुपयांच्या रोकड प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. याप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाला “स्टँडर्ड चोरी, दरोडा आणि खंडणी” असे संबोधत त्यांनी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

केदारे यांनी या घटनेचा जाहीर निषेध करताना माजी आमदार अनिल गोटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अनिल गोटे यांनी वृद्धावस्थेत आणि आजारपणातही पाच-सहा तास बसून हा भ्रष्टाचार उघड केला. त्यांचे आभार,” असे ते म्हणाले. त्यांनी हा पैसा जनतेचा असून, सरकारची तिजोरी कुणाच्या मक्तेदारीची नाही, असे ठणकावले.

यांनी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील 11 आमदार आणि त्यांच्या खासगी स्वीय सहायक (पीए) किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. “गुणवत्ता तपासणीच्या नावाखाली धुळ्यातील अधिकाऱ्यांकडून वसुली केली जात होती. विश्रामगृहात सापडलेली 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड हा भ्रष्टाचाराचा पुरावा आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “किती रस्ते, पूल, नाले यांच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला? किती दर्जाहीन कामांना मंजुरी मिळाली? राज्य सरकारने वसुलीसाठी मॉडेल तयार केले आहे का?” गुलमोहर विश्रामगृहाला “चोरांचा अड्डा” संबोधत त्यांनी येथील ऐतिहासिक वारसाची विटंबना झाल्याची खंत व्यक्त केली.

यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही टीका केली. “करोडो रुपयांची चोरी दरोडा मानली जात नाही, पण दोन-पाच रुपयांची चोरी दरोडा ठरते. पारधी समाजाला छोट्या चोरीसाठी तुरुंगात डांबले जाते, पण करोडो लुटणाऱ्यांवर कारवाई होत नाही. यामागे सरकार आणि पोलिसांचा संगनमत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केदारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक (SIT) च्या “डोंगऱ्या चौकशी”ऐवजी तात्काळ कारवाईची मागणी केली. “11 आमदार आणि त्यांच्या पीएवर दरोडा, खंडणी आणि चोरीचे गुन्हे दाखल करावेत. भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा उभारावा लागेल,” असे ते म्हणाले. त्यांनी अर्जुन खोतकर यांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित करत, “ज्यांचे आयुष्य भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात गेले, ते काय दर्जाचे प्रमाणपत्र देणार?” अशी टीका केली.राज्य सरकारच्या प्रतिमेवर परिणामया प्रकरणामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी दलित आणि आदिवासींचा निधी वापरला जातो, पण दुसरीकडे करोडोचा भ्रष्टाचार होतो,” असे केदारे यांनी सांगितले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात स्वतंत्र आणि सक्रिय समित्या स्थापन करण्याची मागणी केली.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!